शिवरायांचे ...जगभरातून इतिहासकारणी केलेली वर्णन
शिवरायांबाबत जगातील मान्यवरांचे उदगार...........
अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."
इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना... केली."
मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) - "साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."
प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."
ब्यारन कादा (जपान) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."
अन्तिनिओ (पोर्तुगीज व्हायसराय) - "छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."
मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."
डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) - "स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत."
इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना... केली."
मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) - "साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."
प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."
ब्यारन कादा (जपान) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."
अन्तिनिओ (पोर्तुगीज व्हायसराय) - "छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."
मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."
डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) - "स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत."
|
|
शिवाजी महाराज दिसायला कसे होते ?
How did Shivaji bhosale raje look ?
शिवाजी महाराज दिसायला कसे होते ? शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली अनेक माणसे त्यावेळी होती . पाश्चिमात्यात हेन्री ऑक्झेडन , निकालो मनुची , थेव्हनॉट , उस्टीक , इ. तर भारतीयात परमानंद , परकलदास इ. परंतू फारच थोड्या व्यक्तीँनी शिवरायांच्या व्यक्तिमत्वाबद् दल किँवा शारीरिक ठेवणीबद्दल प्रत्यक्षात नोंद करुन ठेवली आहे . इ.स. १६६४ मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी वखारीतल्या इंग्रज अधिकारी एस्केलिऑट याने केलेले वर्णन- "His personality is described by them , who have seen him , to be of mean stature (medium height) lower some what than i am (when) erect and of an excellent proportion . Actual in exercise ane whenever he speaks seems to smile , a quick and piercing eye and witter than any of his people." अर्थ- 'शिवाजी आपल्या दक्षिणेकडील इतर मावळ्यांपेक्षा उजळ वर्णाचा असून मध्यम बांध्याचा आहे . त्याची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला दिसतो ; परंतु शरीर मात्र अत्यंत प्रमाणबध्द आहे . कोणतीही गोष्ट नजरेत तत्काळ पकडणारी भेदक दूरदृष्टी हे त्याचे खास लक्षणीय वैशिष्ट्य आहे.' इ.स. १६६६ साली फ्रेँच प्रवासी थेव्हनॉट वर्णन करतो , "This Raja is short and tawny , with quick eyes that shew a great deal of wit . He eats but ones a day commonly and is in good health ." अर्थ- "हा राजा ठेँगणा व पिवळसर गौर वर्णाचा आहे . नेत्र तेजस्वी असून बुध्दीमत्तादर्शक आहेत . तो दिवसातून फक्त एकदाच भोजन करतो आणि (तरीही) त्याची प्रकृती उत्तम आहे ." |
How did Shivaji bhosale raje look ?
इ.स. १६६६ मध्ये राजे आग्र्यात गेले असताना तिथे परकलदास याने राजांना पाहिले . तो लिहितो , " अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सो ही देखता दीस जी । अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपुछो राजवी देसौ जी । हिम्मती मरदानगी ने देखता ही असौ दिसो जू बहुत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो । सेवाजी के दाढी छै ।" अर्थ- " प्रथमदर्शी दिसण्यात शिवाजी हा बांध्याने किरकोळ आहे . पण त्याचा रंग विलक्षण गोरा आहे . त्याचे राजतेज असे की कोणीही त्याला पाहिले की आपोआपच वाटावे की हा राजाच असला पाहिजे . त्याची हिम्मत आणि मर्दुमकी पाहिली की हा बुलंद हिमतीचा मर्द माणूस असला पाहिजे असे वाटू लागते . शिवाजीला दाढी आहे ." कॉस्मा द गार्द या पोर्तुगीजाने केलेले वर्णन (१६९५) " With a clear and fair nature had given him the greatest perfections specially that they seemed to dart rays to fire . To these was added a quick , clear and acute intelligence." अर्थ- "राजांचा चेहरा मोहक होता . निर्सगाने त्याला असावी तशी चेहरेपट्टी दिलेली होती . विशेषतः त्याचे काळेभोर व विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू त्यातून अग्निस्फुल्लिँग बाहेर पडत आहेत ." राज्याभिषेकाप्रसंगी प्रत्यक्ष पाहून इंग्रज वकील हेन्री ऑक्झेडने शिवरायांचे लिहिलेले वर्णन- "शिवाजी महाराज ४७ वर्षाचे असून देखणे होते . त्यांच्या चर्येवरुन त्यांची बुध्दीमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई . त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता . त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व बाकदार होते . त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती . त्यांचे बोलणे निश्चयात्मक , स्पष्ट पण जलद होते ." |
आमच्या भूमीत जन्माला आला असता तर.............
संपूर्ण जगावर राज्य मिळवल्या नंतर इंग्लंडच्या लौर्ड एलफिस्टन या ब्रिटीश अधिकार्याने मरण येण्याच्या आधी आपल्या डायरीत लिहले की,"आम्ही पूर्ण जग फिरलो त्यातील भारत हा मुलुख आम्ही जिंकलाच कसा याच्यावर आज ह़ी विश्वास बसत नाही आणि शेवटी त्याने लिहले की, शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर ह़ी पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते."
राजांची दहशत--
" राजांची दहशत पहा कशी होती " इ .स .१६५७ साली शिवरायांच लक्ष होते स्वराज्याचे आरमार ....कारण या समुद्रावर सत्ता होती अरबी हबशी अणि फिरंगी पोर्तुगीज ....आरमार उभारायला सुरवात झाली एक एक बंदर राजांचे सहकारी काबिज करून भगवा फडकावत होते ..त्या दरम्यान पोर्तुगीज वाइसरॉय याने आपल्या पोर्तुगीज आरमार प्रमुखाला पत्र पाठवले की " डोंगराताला राजा आता पाण्यात उतरला आता कुठे जायच ते ठरवा "
||आरमार||
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर सन १६५९ मध्ये मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.पोर्तुगीज ,सिद्दी,इंग्रजा ंसारख्या प्रबळ आरमारी शक्तीना तोंड देउन सिंधुसागर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी महाराजांनी उभारले.मराठ्यां च्या आरमाराविषयी गोव्याचा व्हाइसराँय सन १६६७ मध्ये आपल्या पोर्तुगीजच्या राजाला लिहीतो की," शिवाजीने नौदल ही मला भितीदायक वाटते. कारण त्याच्याविरूद्ध आम्ही सुरवातीस कारवाई न केल्याने त्याने किनार-यावर चांगले किल्ले बांधले आणी त्याच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत.पण ही तारवे मोठी नाहीत"
आपल्या आरमाराच्या जोरावर त्यानी इंग्रज व सिद्दी यांच्याही समुद्रावर लढाई करून खांदेरी दुर्ग उभारला.यावरून मराठी आरमाराच्या वाढत्या बळाची जाणीव होते.
(दुर्ग-खंड पहिला पुस्तकातुन. .
||आरमार||
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर सन १६५९ मध्ये मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.पोर्तुगीज ,सिद्दी,इंग्रजा ंसारख्या प्रबळ आरमारी शक्तीना तोंड देउन सिंधुसागर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी महाराजांनी उभारले.मराठ्यां च्या आरमाराविषयी गोव्याचा व्हाइसराँय सन १६६७ मध्ये आपल्या पोर्तुगीजच्या राजाला लिहीतो की," शिवाजीने नौदल ही मला भितीदायक वाटते. कारण त्याच्याविरूद्ध आम्ही सुरवातीस कारवाई न केल्याने त्याने किनार-यावर चांगले किल्ले बांधले आणी त्याच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत.पण ही तारवे मोठी नाहीत"
आपल्या आरमाराच्या जोरावर त्यानी इंग्रज व सिद्दी यांच्याही समुद्रावर लढाई करून खांदेरी दुर्ग उभारला.यावरून मराठी आरमाराच्या वाढत्या बळाची जाणीव होते.
(दुर्ग-खंड पहिला पुस्तकातुन. .
"आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल, तशी त्याची भुमी प्रजा आहे. तद्वतच, ज्याजवऴ आरमार त्याचा समुद्र, त्याकरीता आरमार अवश्यमेव करावे....."
-- छत्रपती शिवाजी महाराज*
एक उत्तम, आदर्श शासक व प्रशासक आणि काऴाची पुढची पाऊले ओळखणाऱ्या शिवरायांनी उभारलेले आज हेच भारतीय आरमार INDIAN NAVY जगातील शक्तिशाली आरमार होय.
याचे श्रेय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनाच जाते. आणि म्हणूनच शिवरायांना " FATHER OF INDIAN NAVY " म्हणून फक्त हिंदुस्थानातच नाही तर संपूर्ण जगात ओऴखले जाते.
आज याच शिवरायांच्या त्या मह्त्वपुर्ण आणि धाडसी निर्णयामुऴे आजचा प्रगतशिल `भारत` कित्तेक सागरी मैलांनवर आपला तिरंगा ध्वज (भगवा ध्वज) दिमाखात मीरवतो आहे, आणि शत्रूची झोप उडवत आहे.
-- छत्रपती शिवाजी महाराज*
एक उत्तम, आदर्श शासक व प्रशासक आणि काऴाची पुढची पाऊले ओळखणाऱ्या शिवरायांनी उभारलेले आज हेच भारतीय आरमार INDIAN NAVY जगातील शक्तिशाली आरमार होय.
याचे श्रेय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनाच जाते. आणि म्हणूनच शिवरायांना " FATHER OF INDIAN NAVY " म्हणून फक्त हिंदुस्थानातच नाही तर संपूर्ण जगात ओऴखले जाते.
आज याच शिवरायांच्या त्या मह्त्वपुर्ण आणि धाडसी निर्णयामुऴे आजचा प्रगतशिल `भारत` कित्तेक सागरी मैलांनवर आपला तिरंगा ध्वज (भगवा ध्वज) दिमाखात मीरवतो आहे, आणि शत्रूची झोप उडवत आहे.
"डोंगरातला राजा आता पाण्यात उतरला, आता कुठे जायचे ते ठरवा." -पोर्तुगीज व्हाइसरॉय (इ.स.१६५७)
शिवराय यांचे विचार.....
"जर कुठे मार्ग असेल तर मी तो शोधूनकाढीनजर कुठे मार्ग नसेल तर मी तो निर्माणकरीन" ... संकटे आणि अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहे पण आलेल्या संकटांवर मात करुन आपल्याला यशाचे शिखर गाठायचे आहे. "परिस्थीतीवररडण्यापेक्षा परिस्थीतीवर लढण्यातच खरा पुरुषार्थ आहे"! ... छत्रपती शिवाजी महाराज.
रोहिडेश्वराच्या पायी ज्या शपथा झाल्या, त्या वज्रप्राय आहेत. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे. त्यामध्ये कोणतीही शक्ती अडथळे आणू शकणार नाही..... छत्रपती शिवाजी महाराज.
'' समुद्री चाचेगिरी हा सर्वात मोठा धोका" जो सागरी मार्गावर सत्ता प्रस्थापित करील तोच जगावर राज्य करील--छत्रपती शिवाजी महाराज ... छत्रपती शिवाजी महाराज.
"कधी कधी संकटे आली की दोन पावले मागे सरकणेच हिताचे असते. वाघ दोन पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे, तर पुढे झेप घेण्यासाठी. जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो, तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो" -... छत्रपती शिवाजी महाराज.
शेतकर्यांच्या भाजीच्या देठाला देखिल हात लाऊ नका.गवताच्या कडीला देखिल हात लाऊ नका.पानवठ्याचे पानी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका. शेतकर्याला मोबदाला दिल्या शिवाय फळ घेऊ नका. झाडे तोडू नका. गरजे साथी लाकूड फाटा हवा असेल तर जीर्ण झालेले वृक्ष तोडा अणि त्याजागी नवीन झाड़ लावा.शेतकर्या कडून भाजीचे पान देखिल फुकट घेऊ नका. कारण त्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागतात."-- छत्रपति शिवराय
मावळा--राजे गडाला सर्व बाजूनी वेढा पडला आहे .
राजे -अरे वा म्हणजे आपणाला कोणत्याही बाजूने हल्ला करता येईंल........ छत्रपती शिवाजी महाराज.
रोहिडेश्वराच्या पायी ज्या शपथा झाल्या, त्या वज्रप्राय आहेत. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे. त्यामध्ये कोणतीही शक्ती अडथळे आणू शकणार नाही..... छत्रपती शिवाजी महाराज.
'' समुद्री चाचेगिरी हा सर्वात मोठा धोका" जो सागरी मार्गावर सत्ता प्रस्थापित करील तोच जगावर राज्य करील--छत्रपती शिवाजी महाराज ... छत्रपती शिवाजी महाराज.
"कधी कधी संकटे आली की दोन पावले मागे सरकणेच हिताचे असते. वाघ दोन पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे, तर पुढे झेप घेण्यासाठी. जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो, तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो" -... छत्रपती शिवाजी महाराज.
शेतकर्यांच्या भाजीच्या देठाला देखिल हात लाऊ नका.गवताच्या कडीला देखिल हात लाऊ नका.पानवठ्याचे पानी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका. शेतकर्याला मोबदाला दिल्या शिवाय फळ घेऊ नका. झाडे तोडू नका. गरजे साथी लाकूड फाटा हवा असेल तर जीर्ण झालेले वृक्ष तोडा अणि त्याजागी नवीन झाड़ लावा.शेतकर्या कडून भाजीचे पान देखिल फुकट घेऊ नका. कारण त्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागतात."-- छत्रपति शिवराय
मावळा--राजे गडाला सर्व बाजूनी वेढा पडला आहे .
राजे -अरे वा म्हणजे आपणाला कोणत्याही बाजूने हल्ला करता येईंल........ छत्रपती शिवाजी महाराज.
_'शत्रुच्या स्त्रियांवर अत्याचार केल्याने राष्ट्राचे भले होत असेल तर ते राष्ट्र तुम्ही स्वत:चे निर्माण करा कुठेतरी...!!! ''आमच्या राष्ट्रात ह्या विचारसरणीला जागा नाही -छत्रपती शिवाजी महाराज.
_
परस्त्रीप्रति आदर
स्त्री ही कुठलीही असो , प्रत्यक्ष शत्रुच्या मुलखातील जरी असली तरी तीअखेर मातेसमानच असते, असा विचार छत्रपतींनी रयतेला दिला। शत्रुच्यास्त्रियांना सन्मानाने वागवणारा शिवबा अशी जनमानसात त्यांची ख्याती होती.त्यांच्या कारकिर्दीत स्त्रियांना सैन्यापासून तसूभरही भय नसे. एकचारित्र्यसंपन्न राजा म्हणून त्यांची ओळख होती. परस्त्रीचा आदर-सन्मानकरणे, हा आमचा राजधर्म आहे, असे हे म्हणत. स्त्रिचा अनादर केल्याबद्दलशिक्षा म्हणून शिवबांनी एका गावप्रमुखाचे हातपाय तोडण्याचे हुकूम बजावलेहोते. आबाजी सोनदेवने कल्याणच्या सुभेदारची सून महाराजांसमोर पेश केलीअसता, महाराजांनी लगेचच त्या स्त्रीला सन्मानपूर्वक घरी पोहोचविण्याचेआदेश जारी केले. परस्त्रीविषयी महाराजांच्या मनात नितांत आदर होता..
सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते
शिवकालीन इतिहासात देवळांप्रमाणे मशिदांनाही सरकारी तिजोरीतून अर्थसहाय्य देण्यात येत असे। शिवकालीन धर्म म्हणजे स्वराज्याचे व परंपरेचे रक्षणकरुन, रयतेत आत्मविशवास व चैतन्य निर्माण करणे होय. मोहिमेवर असतानामुसलमानांच्या तसेच अन्य धर्मियांचे धर्मग्रंध व धर्मस्थळांचा आदर करावा, असा छत्रपतींचा सैन्यांना हुकूम असायचा. शिवरायांचे धार्मिक धोरण खर्याअर्थाने उदार होते. महाराजांच्या आरमारात दर्यासारंग दौलतखान, इब्राहिमखान सारखे अनेक मुस्लीम अधिकारी होते. इतकेच नव्हे तर, त्यांच्या लष्करातविविध पदांवर 700 हून अधिक पठान कार्यरत होते. राजधर्म हा सर्वश्रेष्ठधर्म होय, असे ते म्हणत. युद्धभूमीवर सापडलेली कुराणाची प्रत त्यांनीमौलवीकडे सोपविण्याची घटना सर्वश्रुत आहे.
शिवबा हे एक चारित्र्यसंपन्न व परधर्माप्रति सहिष्णुता बाळगणारे राजे होते. उच्च पदावरनेमणूक करताना त्या व्यक्तिची जात-धर्म न पहाता देशप्रेम, राजाप्रती आदर, निष्ठा, युद्धनैपुण्य हे गुणवैशिष्टये परखूनच ते त्या व्यक्तीची नियुक्तीकरित असत. सर्वधर्मसमभाव हा मूलमंत्र छत्रपतींनी आयुष्यभर जोपासला.त्याचबरोबर छत्रपतींनी धर्म व राजकारण याची फारकत करुन सर्वधर्मसमभावाचीरयतेला शिकवण दिली
स्त्री ही कुठलीही असो , प्रत्यक्ष शत्रुच्या मुलखातील जरी असली तरी तीअखेर मातेसमानच असते, असा विचार छत्रपतींनी रयतेला दिला। शत्रुच्यास्त्रियांना सन्मानाने वागवणारा शिवबा अशी जनमानसात त्यांची ख्याती होती.त्यांच्या कारकिर्दीत स्त्रियांना सैन्यापासून तसूभरही भय नसे. एकचारित्र्यसंपन्न राजा म्हणून त्यांची ओळख होती. परस्त्रीचा आदर-सन्मानकरणे, हा आमचा राजधर्म आहे, असे हे म्हणत. स्त्रिचा अनादर केल्याबद्दलशिक्षा म्हणून शिवबांनी एका गावप्रमुखाचे हातपाय तोडण्याचे हुकूम बजावलेहोते. आबाजी सोनदेवने कल्याणच्या सुभेदारची सून महाराजांसमोर पेश केलीअसता, महाराजांनी लगेचच त्या स्त्रीला सन्मानपूर्वक घरी पोहोचविण्याचेआदेश जारी केले. परस्त्रीविषयी महाराजांच्या मनात नितांत आदर होता..
सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते
शिवकालीन इतिहासात देवळांप्रमाणे मशिदांनाही सरकारी तिजोरीतून अर्थसहाय्य देण्यात येत असे। शिवकालीन धर्म म्हणजे स्वराज्याचे व परंपरेचे रक्षणकरुन, रयतेत आत्मविशवास व चैतन्य निर्माण करणे होय. मोहिमेवर असतानामुसलमानांच्या तसेच अन्य धर्मियांचे धर्मग्रंध व धर्मस्थळांचा आदर करावा, असा छत्रपतींचा सैन्यांना हुकूम असायचा. शिवरायांचे धार्मिक धोरण खर्याअर्थाने उदार होते. महाराजांच्या आरमारात दर्यासारंग दौलतखान, इब्राहिमखान सारखे अनेक मुस्लीम अधिकारी होते. इतकेच नव्हे तर, त्यांच्या लष्करातविविध पदांवर 700 हून अधिक पठान कार्यरत होते. राजधर्म हा सर्वश्रेष्ठधर्म होय, असे ते म्हणत. युद्धभूमीवर सापडलेली कुराणाची प्रत त्यांनीमौलवीकडे सोपविण्याची घटना सर्वश्रुत आहे.
शिवबा हे एक चारित्र्यसंपन्न व परधर्माप्रति सहिष्णुता बाळगणारे राजे होते. उच्च पदावरनेमणूक करताना त्या व्यक्तिची जात-धर्म न पहाता देशप्रेम, राजाप्रती आदर, निष्ठा, युद्धनैपुण्य हे गुणवैशिष्टये परखूनच ते त्या व्यक्तीची नियुक्तीकरित असत. सर्वधर्मसमभाव हा मूलमंत्र छत्रपतींनी आयुष्यभर जोपासला.त्याचबरोबर छत्रपतींनी धर्म व राजकारण याची फारकत करुन सर्वधर्मसमभावाचीरयतेला शिकवण दिली
_समुद्री चाचेगिरी हा सर्वात मोठा धोका" जो सागरी मार्गावर सत्ता प्रस्थापित करील तोच जगावर राज्य करील--छत्रपती शिवाजी महाराज
भारताच्या सागरी सीमांचा बंदोबस्त करणे हे देशाच्या संरक्षण विषयक सिद्धतेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, पण आतापर्यंत भारतातील सत्ताधीशांपैकी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी सागरी सुरक्षेचे महत्त्व ओळखून त्या दृष्टीने सागरी सीमेवर बंदोबस्त ठेवला होता. आज समुद्री चाचेगिरी हा अनेक देशांसमोरील महत्त्वाचा धोका बनला आहे.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे या शहरावर दहशतवाद्यांचे जास्त लक्ष आहे,, की पाकिस्तान हा जागतिक दहशतवाद्यांचा केंद्रबिंदू आहे.
पण आमचे सागरी सरक्षक यांना याचे काहीही पडलेले नाही .मुबई वर कोणतेही जहाज येवून जाते हे या system माहित नाही. अजून भारताने ने २६/११ ह्या हल्लातून काहीच शिकलेले नाही असे दिसते आहे .
अजून हि भारताला बळकट बनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ह्याचीच युद्धनीती वापरावी लागणार आहे .
हे ह्या दळभद्री सरकार सागा........
-उत्तम सिद्ध
पण आमचे सागरी सरक्षक यांना याचे काहीही पडलेले नाही .मुबई वर कोणतेही जहाज येवून जाते हे या system माहित नाही. अजून भारताने ने २६/११ ह्या हल्लातून काहीच शिकलेले नाही असे दिसते आहे .
अजून हि भारताला बळकट बनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ह्याचीच युद्धनीती वापरावी लागणार आहे .
हे ह्या दळभद्री सरकार सागा........
-उत्तम सिद्ध
मराठी आरमारातील दोन लढाऊ नौका.. गुराब आणि गलबत
गुराबा या आकाराने मोठ्या असतात, परिणामी यांच्यावर दारुगोळा आणि साधनसामग्री जास्त ठेवता येते, त्या मानाने गलबते आकाराने लहान आणि निमुळती असतात. गलबतांच्या आकारमानामूळे जरी दारुगोळा आणि तोफा या कमी असल्या तरी त्यांच्या जलद हालचाली आणि वेग यांच्यामूळे शत्रूनौकांना शह देणे सहज शक्य होत असे.. सदर रेखाचित्रातील लाल रंगाचा भाग पाण्याच्या खाली रहात असून त्यांच्यावर नौकेची रचना कशी असे याचा अंदाज बांधता येऊ शकतो.. ! मराठ्यांनी स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा 'वाऱ्यावीण प्रयोजन नाही' अश्या 'फरगात' (फ्रीगेट्स) न बनवता 'गुराबे' आणि 'गलबते' बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. ह्यासोबत तरांडे, तारू, शिबाड, मचवा, पगार, वाघोर, तिरकटी आणि पाल असे नौकांचे प्रकार आज्ञापत्रात आढळतात.
गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.
गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.
मराठ्यांची नवी जहाजे खाडीमधून आता खुल्या समुद्रात संचार करू लागली होती. गनीम समोर आल्यावर काय करावे कसे वागावे ह्याबाबत स्पष्ट निर्देश आरमाराला दिले गेले होते. भर समुद्रात गनीम समोर आला तर एकत्र येऊन कस्त करून त्याच्याशी झुंजायचे, मात्र वाऱ्याची दिशा आपल्या विरुद्ध दिशेने असल्यास, गलबत योग्य चालवता येत नसल्यास गानिमाशी गाठ न घालिता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे. राजे म्हणतात,"तरांडीयास आणि लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपण राखून गनीम घ्यावा."
बरेचदा चकवा म्हणून शत्रू तहाचे निशाण दाखवतो आणि हरलो असे दाखवतो तेंव्हा लगेचच उडी घालून त्याच्या नजीक जाऊ नये, किंवा गनिमाला सुद्धा जवळ बोलावू नये, असे प्रशिक्षण आरमारास दिलेले होते. काही दगाफटका व्हायची शक्यता दिसल्यास कसलीही तमा न बाळगता तोफांच्या माराखाली तरांडे फोडून टाकावे असे स्पष्ट आदेश सरखेलांना होते.
औरेगजेब व मोगली सरदारना शिवरायचे पत्र ...
मोगली, विजापूर दरबारात आता कोणी मातब्बर सरदार राहिला नाही.कित्येक वर्ष तुमचे सल्लागार व योद्धे आमच्या मुलखावर पराजय पाहून जातात आणि तरीही ते बादशहाला खोट्या बातम्या कळवता की आम्ही शिवाजीच मुलुख काबीज केला आहे हे असे लिहिणे निव्वळ लज्जास्पद आहे .शास्ताखान आमचा पाडाव करतो म्हणून तीन वर्षे बादशहास लिहून लिहून दमला आणि शेवटी फजिती पाहून पळून गेला त्याच्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्यास भुगताला तो सूर्यासारखा लख्ख सर्वांसमोर आहे. आमच्या भूमीचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. तुमचे सरदारच्या किती खोट्या खबरा लिहून कळवा असतील त्यास आम्ही समर्थ आहोत .
शिवाजी महाराज
शिवाजी महाराज
आम्ही अमेरिकाला पराभूत करू शकलो.........
उत्तर विएतनामच २० वर्षा पासनं जगातल्या सगळ्यात ताकदवर देश म्हणजे अमेरिका सोबत युद्ध चालु होतं १९५५ ते १९७५. पण शेवटी २० वर्षाच्या युद्धा नंतर उत्तरी विएतनाम ने
अमेरिका चा पराभव केला आणी उत्तर व दक्षिण विएतनाम ला एकत्र केलं.
विएतनाम ची संरक्
षण मंत्री 'मादाम बिन्ह' भारतात १९७७ मध्ये आली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री जगजीवन राम यांनी त्यांचेस्वागत केले.
आता जेव्हा पण असे विदेशी पाहुने भारतात येतात तेव्हा भारत सरकार त्यांना 'राज घाट', 'शांती वन','कुतुब मिनार', 'ताज महाल' ई. वास्तु दाखवतात. पण
त्या मादाम बिन्ह ने एक वेगळीच मागणी टाकली.
ती म्हटली की, "हे सगळं नंतर बघेल, सर्वात पहिले मला रायगडावर जाऊन
शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालुन त्यांच्या पायांना स्पर्ष करायचा आहे."
नंतर तिला जेव्हा विचारलं की तुम्हाला महाराजांबद्दल इतका आदर का?
तेव्हा तिने उत्तर दिलं,
''जेव्हा अमेरिका सोबत आमचं (विएतनामच) युद्ध सुरू होतं तेव्हा आमच्या सौन्यात 'Vietcong' मध्येआमचे सैनिक शिवाजी महाराज आणी त्यांच्या मवळ्यांच्या शौर्य गाथा सांगायचे. त्यांनी प्रचंड मोठ्या मुगलांच्या सैन्याला कसं
पराभूत केलं हे ऐकुन आमच्या सैन्याचं मनोबल आणखी वाढलं. आपल्या देशा साठी काही केल पाहिजे हे त्यांना कळलं. सगळी युवा पिढी सैन्यात सामील झाली आणी मरे पर्यंत लढली. एकच आदर्श त्यांच्या समोर होता. तो म्हणजे फक्त शिवाजी महाराज यांचाच. त्यांना बाजी प्रभूंची शौर्य गाथा सांगितली. त्यांना शाहिस्तेखाना बद्दल सांगितलं. अचुक नियोजन आणी 'युद्धतंत्र'(गनिमी कावा) वापरल्या मुळे आम्ही अमेरिकाला पराभूत करू शकलो. विशिष्ट अश्या युद्धतंत्राचे जनक सुद्धा शिवाजी महाराज आहेत. महाराजांच्या या युद्धतंत्रामुळेच आमचा विजय झाला. आणी Cuba चे शे गुवेरा आणी फिडेल कासत्रो यांचा सुद्धा
पराभव आम्ही करु शकलो. म्हणुन मला अभिमान वाटतो " छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा आणीमी नशीबवान आहे की रायगड बघु शकले.''
अमेरिका चा पराभव केला आणी उत्तर व दक्षिण विएतनाम ला एकत्र केलं.
विएतनाम ची संरक्
षण मंत्री 'मादाम बिन्ह' भारतात १९७७ मध्ये आली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री जगजीवन राम यांनी त्यांचेस्वागत केले.
आता जेव्हा पण असे विदेशी पाहुने भारतात येतात तेव्हा भारत सरकार त्यांना 'राज घाट', 'शांती वन','कुतुब मिनार', 'ताज महाल' ई. वास्तु दाखवतात. पण
त्या मादाम बिन्ह ने एक वेगळीच मागणी टाकली.
ती म्हटली की, "हे सगळं नंतर बघेल, सर्वात पहिले मला रायगडावर जाऊन
शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालुन त्यांच्या पायांना स्पर्ष करायचा आहे."
नंतर तिला जेव्हा विचारलं की तुम्हाला महाराजांबद्दल इतका आदर का?
तेव्हा तिने उत्तर दिलं,
''जेव्हा अमेरिका सोबत आमचं (विएतनामच) युद्ध सुरू होतं तेव्हा आमच्या सौन्यात 'Vietcong' मध्येआमचे सैनिक शिवाजी महाराज आणी त्यांच्या मवळ्यांच्या शौर्य गाथा सांगायचे. त्यांनी प्रचंड मोठ्या मुगलांच्या सैन्याला कसं
पराभूत केलं हे ऐकुन आमच्या सैन्याचं मनोबल आणखी वाढलं. आपल्या देशा साठी काही केल पाहिजे हे त्यांना कळलं. सगळी युवा पिढी सैन्यात सामील झाली आणी मरे पर्यंत लढली. एकच आदर्श त्यांच्या समोर होता. तो म्हणजे फक्त शिवाजी महाराज यांचाच. त्यांना बाजी प्रभूंची शौर्य गाथा सांगितली. त्यांना शाहिस्तेखाना बद्दल सांगितलं. अचुक नियोजन आणी 'युद्धतंत्र'(गनिमी कावा) वापरल्या मुळे आम्ही अमेरिकाला पराभूत करू शकलो. विशिष्ट अश्या युद्धतंत्राचे जनक सुद्धा शिवाजी महाराज आहेत. महाराजांच्या या युद्धतंत्रामुळेच आमचा विजय झाला. आणी Cuba चे शे गुवेरा आणी फिडेल कासत्रो यांचा सुद्धा
पराभव आम्ही करु शकलो. म्हणुन मला अभिमान वाटतो " छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा आणीमी नशीबवान आहे की रायगड बघु शकले.''
_|| महाराजांच्या शेवटच्या क्षणी असं घडलं असेल का ...... ||
हा क्षण शिवमय , शंभूमय अशा " विश्वास पाटील " यांच्या मनात आला होता त्यांनी तो " बाबासाहेब पुरंदरे " यांना सांगितला होता.
तो मी माझ्या शब्दात मांडत आहे , कुठे काही चूक झाली तर माफी असावी.....
तो संवाद असा -
" बाबा , महाराजांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या शयनगृहात सोयराबाई , राजाराम आणि त्यांच्या जवळच्या माणसांमध्ये हिरोजी फर्जंद देखील असतील का ......
हिरोजी फर्जंद महाराजांचा निरोप घेऊन , त्या शयनगृहातून जाताना महाराजांना मागे वळून पाहिलं असेल का........
आणि महाराजांकडे बघून त्यांच्या मनात हा विचार आला असेल का........
कि " महाराज , आग्रा सुटकेच्या वेळेस राजं तुमच्या बिछान्यावर मी झोपलो होतो आणि आज तुमच्या ह्या शेवटच्या क्षणी, त्या मृत्युच्या बिछान्यावर राजं मला झोपू द्याल का .....मला झोपू द्याल का राजं ........मला झोपू द्याल का ".
विश्वास पाटील यांना मानाचा मुजरा......
|| राजं ही तुमची शेवटची मोहीम मला आखू द्याल का ,
तुमच्या मृत्युच्या बिछान्यावर मला झोपू द्याल का ,
जन्मलो मी हिरोजी फर्जंद म्हणोनि,
पण शेवटचा श्वास मला शिवबा होऊनी घेऊ द्याल का.......
शेवटचा श्वास मला शिवबा होऊनी घेऊ द्याल का....... ||
- मिलिंद भोसले.
_जोपर्यंत जिजाउ जन्माला येत नाही तो पर्यंत शिवाजी जन्माला येत नाही..........???
_राजे ज्या पन्हाळ्यावर तुम्ही शिताफीने चकमा दिलात सिद्धीला, त्याच पन्हाळ्यावरच्या पंचतारांकीत हॉटेल मधे आज तुमचेच मावळे नाचवतायत, नागवतायत, नासवतायत, कल्याण्च्या सुभेदारांच्या सुना राज रोस..... राजे आता इथे अत्याचाराबद्दल केले जात नाहीत हात कलम उलट केले जातात आणखी बळकट आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या कोटांचे प्रपंच चालवीण्यासाठी.राजे आता तानाजी, बाजी आणि मुरारबाजी सुद्धा बोलू लाजलेत फितुरांच्या भाषा. आणि आपल्याच डोळ्यादेखत आपल्याच बायकापोरांची कत्तल होत आसताना बदलत नाहीत त्यंच्या कपाळावरील रेषा........ राजे तुमची आठवण येते कधीतरी सरकारी कचेरीतील तुमच्या तसवीरीकडे बघून..... आणि मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचे पण घालतो वाद तुमचा जन्मसाल 1627 का 1630. राजे या महाराष्ट्रात तुम्ही अलीकडे तीन तीनदा जन्माला येता नशीब तुम्ही जन्माला आला होता का नव्हता याच्यावर अजून वाद नाही सुरू झाला..... राजे तुम्ही गरजला होता मराठा तितूका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा..... आता आम्ही गरजत असतो मराठा तितूका खेळवावा महाराष्ट्र धर्म बुडवावा..... राजे तुमची ईच्छा होती हे राज्य व्हावे ही श्रीं ची ईच्छा आणी आता आम्ही गरजत असतो हे राज्या नष्ट व्हावे ही श्रीं ची ईच्छा..... आणि अशावेळी वाटत राजे तुम्ही आसायला हवे होतात.... पण पुन्हा वाटत राजे तुम्ही नाही आहात तेच बरय..... कारण तुम्ही असता तर पुन्हा स्वराज्याच्या मार्गी लागला असाता, पुन्हा गड किल्ले घेण्याच्या मागे लागला आसता. पण आता गड किल्ले घेउन उपयोग नाही त्यासाठी तुम्हला एखादा सुरक्षीत मतदार संघ शोधावा लागला असता. आणि आता मतदार संघ सुरक्षीत राहीलेत कुठे? त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पायावर झोकावे लागले असते......... आणी राजे आग्य्राच्या भेटीत मागच्या रांगेत उभे केल म्हणून बाणेदार पणे दरबार त्यागणारे तुम्ही श्रेष्ठींच्या पायावर झुकाल कसे? अरे महाराष्ट्राचा स्वाभीमान पुन्हा उभाळेल आनि म्हणाल अरे नसेल पक्ष नसुदे अपक्ष म्हणून उभा राहीन.......... अरे माझे तानाजी बाजी मुरारबाजी माझ्या पाठीशी असताना मला फिकीर कसली????? पण राजे हे तानाजी बाजी मुरारबाजी तरी आता पहील्यासारखे राहीलेत कुठे????? आत्ताचे आमचे कर्यकर्तेच वेगळे......... सकाळी एकाकडे, दुपारी दुसर्यासकडे, संध्याकाळी जेवणावळीला तिसर्या्कडे आणि दुसर्यातदिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी अर्ज असतो राजे..... तुम्ही म्हणाल नसेल तानाजी बाजी मुरारबाजी पण एखादा तानाजी तरी भेटेल जरूर माला, पण राजे भेटेल तानाजी, तुम्ही संगाल त्याला जा कोंढाणा घेउन ये आणि विचारेल तानाजी पहील्यांदा पगार किती देणार, महागाई भत्ता आहे काय? आणि एवढ सगळ होउन झालाच तानाजी तयार निघाला कोंढाणा घ्यायला...... पण हल्लीच युग मोबाईल युग आहे राजे, तानाजी कोंढाण्यावर लढत असेल आणि खालून कोणीतरी फोन करेल...... “ अरे काय तानाजी काय चाललय ओव्हरटाईम करतोस का काय लेका? ईथे सगळे गरमागरम शिजून तयार आहे तुझ आपल लढायच चललय.... तु लढून तुला काय मिळणार? किल्ला मिळणार राज्यांन, तु का मरतो फुका ये खाली ढाब्यावर पार्टी करू” आणि मग तुम्ही म्हणाल राजे नसतील तानाजी नसुदे, नसतील लोक नसुदे....... लढू रयतेसाठी झगडू जनतेसाठी करू यालोकांसाठी पण राजे ती रयत तरी त्या लायकीची राहीली कुठे???????पैसे घेउन देह विकणारी बाई आणि पैसे घेउन मते देणारी जनता यात तरी आता फरक राहीलाय कुठ????? म्हणून म्हंटले राजे तुम्ही नाही आहात तेच बरय..... पण वातलच तुम्हाला याव एकदा तर एक करा...... येताना एकटे येउ नका........ सोबत मॉसाहेब जिजाऊंना देखील घेउन या........ कारण जोपर्यंत जिजाउ जन्माला येत नाही तो पर्यंत शिवाजी जन्माला येत नाही राजे........
_"राजे पुन्हा जन्माला या" कशाला ?---
_ विश्वाचे राजे.... तुम्हाला एकाच नावापुरते/जातीपुरते/धर्मापुरते मर्यादित करू पाहणाऱ्या आम्हाला पाहायला ?
... आज आम्ही जे आपापसात तुमच्या इतिहासावरून भांडतो आहोत ते पाहायला ?
भविष्य एकीने घडविण्याऐवजी भूतकाळात कुणी काय केले यातून सकारात्मक
वागण्याऐवजी त्यातल्या चुका काढून त्यावर विचार करत बसलेल्या
आणि कुठंत जगणाऱ्या भेकाडांना पाहायला ?
स्वराज्यात पडत चाललेली फुट पाहायला ?
जाती-जातीमधील वाढत चाललेली दुरी पाहायला ?
भ्रष्टाचाराने बरबटलेला समाज पाहायला ?
आप्पलपोटी झालेल्या आम्हा सैतानांना बघायला ?
खुर्चीमध्ये नागासारखे जमून बसलेल्या भ्रष्ट राजकारण्यांना बघायला ?
तुमच्याच जयंतीवरून वाद घालत असलेल्या आम्हा घुबडांना पाहायला ?
तुमच्या गडकोटांवर मदमस्तपणे हुंदाडणाऱ्या माकडांना पाहायला ?
दिवसागणीस आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांना पाहायला ?
स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहूनही गप बसणार्यांना पाहायला ?
तुमच्याच नावावर शिरजोरी करत असलेल्या नराधमांना पाहायला ?
खून-दरोडे-बॉम्बस्फोट-लुटालूट-जाळपोळ-चोऱ्या पाहायला ?
घरात नाही दाना आणि बाजीराव म्हणा म्हणणाऱ्या नालायकांना पाहायला ?
तुम्ही पेटवलेली स्वराज्याची आग विझवून स्वतःचेच बघत असलेल्या आम्हाला पाहायला ?
मावळ्यांचे पाण्यासारखे झालेले आणि थंड पडलेले रक्त पाहायला ?
आणि हे सर्व पाहून तुम्हाला "राजे पुन्हा जन्माला या" म्हणणाऱ्या भेकड मावळ्यांना पाहायला ?
राजे आलात तर भवानी समशेर नक्कीच आणा............... अशा मुंड्या छाटून टाका.
... आज आम्ही जे आपापसात तुमच्या इतिहासावरून भांडतो आहोत ते पाहायला ?
भविष्य एकीने घडविण्याऐवजी भूतकाळात कुणी काय केले यातून सकारात्मक
वागण्याऐवजी त्यातल्या चुका काढून त्यावर विचार करत बसलेल्या
आणि कुठंत जगणाऱ्या भेकाडांना पाहायला ?
स्वराज्यात पडत चाललेली फुट पाहायला ?
जाती-जातीमधील वाढत चाललेली दुरी पाहायला ?
भ्रष्टाचाराने बरबटलेला समाज पाहायला ?
आप्पलपोटी झालेल्या आम्हा सैतानांना बघायला ?
खुर्चीमध्ये नागासारखे जमून बसलेल्या भ्रष्ट राजकारण्यांना बघायला ?
तुमच्याच जयंतीवरून वाद घालत असलेल्या आम्हा घुबडांना पाहायला ?
तुमच्या गडकोटांवर मदमस्तपणे हुंदाडणाऱ्या माकडांना पाहायला ?
दिवसागणीस आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांना पाहायला ?
स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहूनही गप बसणार्यांना पाहायला ?
तुमच्याच नावावर शिरजोरी करत असलेल्या नराधमांना पाहायला ?
खून-दरोडे-बॉम्बस्फोट-लुटालूट-जाळपोळ-चोऱ्या पाहायला ?
घरात नाही दाना आणि बाजीराव म्हणा म्हणणाऱ्या नालायकांना पाहायला ?
तुम्ही पेटवलेली स्वराज्याची आग विझवून स्वतःचेच बघत असलेल्या आम्हाला पाहायला ?
मावळ्यांचे पाण्यासारखे झालेले आणि थंड पडलेले रक्त पाहायला ?
आणि हे सर्व पाहून तुम्हाला "राजे पुन्हा जन्माला या" म्हणणाऱ्या भेकड मावळ्यांना पाहायला ?
राजे आलात तर भवानी समशेर नक्कीच आणा............... अशा मुंड्या छाटून टाका.
_रयतेचा राजा .....बहूजनांसी आधारू
_
शेतकरी हा राज्याचा अन्नदाता आहे, असा विचारछत्रपती शिवरायांनी रयतेला दिला। छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिकशेतकर्यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्यांचे
हित जपणे हे ते आद्यकर्तव्य मानत. शेतकर्यांना प्रोत्साहन मिळावे,
या उद्देशाने शिवबासर्वाधिक उत्पन्न काढणार्या शेतकर्यांना पुरस्कार देऊन गौरवित असत.अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणार्या शेतकर्यांना शिवकाळात मोफत बी-बीयाणेपुरविली जायची. याशिवाय
शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीरप्रमाणात आकारला जात असे.पडिक जमिनीची मशागत करणार्याशेतकर्यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे। दलालांची प्रथा तरछत्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंनामहसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत शिवरायांच्या
कारकिर्दीतच सुरुझाली. दुष्काळाच्या काळात शिवकाळात शेतकर्यांना शेतसारा माफ करुनत्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला जात असे. शेतकर्यांच्या भाजीच्यादेठालाही हात लाऊ नये, मोबदला
दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असेकडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्यांना काढले होते. शेतकर्यांचीआर्थिकस्थिती सुधारली तर देशाला संपन्नता येईल, असे मत
राजेंचं होतं.म्हणूनच छत्रपती हे रयतेचा राजा म्हणून जनमानसात
संबोधले गेले.
_मराठ्यांचे युध्हशास्त्र...
मराठ्यांचे सैन्य संघटन - पायदळ
शिवछत्रपतींना पायदळाचे महत्व कळून चुकले होते. क्रमवरीनुसार मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदालची गतिशीलता घोडदळापेक्षा निस्चित कमी होती. परंतु शिवाजीराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. पायदल सैनिकांची भरती मुख्यत: मावळे आणि हेटकरी आणि इतरही काही लोकांमधून करण्यात येत असे. स्वता शिवाजीराजांतर्फे सैन्यभरती होत असे. प्रत्येक किल्ल्यात पायदाळच्या तुकड्या सज्ज असत. सर्वात लहान तुकडी 10 सैनिकांची असे.
पायदळाची रचना अशी होती :-
१० सैनिकांवर - १ नाईक
५ नाईकांवर - १ हवालदार
३ हवालदारांवर - १ जुमलेदार
१० जुमलेदरांवर - १ हजारी
७ हजारिंवर - सेनापती (सरनौबत)
महाराजांच्या सैन्याच्या पायदळत सुमारे १०५०० सैनिक होते.
पायदळतील जुमलेदारास १० होन प्रतिवार्षी मिळत तर सबनिसास ४० होन मिळत असत. हजारीस ५०० होन प्राप्ती होत असे.
पायदालचे मुख्य कार्य पर्वतीय आणि दुर्गम भागातील शत्रूशि लढण्याचे असे. सोबत त्यांना घोडेस्वरांचे सुध्हा रक्षण करावे लागत असे. पायदळात ठिकठीकाणहून गोळा केलेले अनेक नवशिके लोक होते. त्यांना युध्हाचे शिक्षण देण्याकरिता त्यांना उघड्या शेतात तीन महिने तळ ठोकावा लगे, वेल पडल्यास घोडेस्वारी, युध्कलेचे सर्व डाव कसे खेळावेत आणि लढाई कशी करावी या विषयी चे शिक्षण त्यांना काळजी पूर्वक दिले जात असे.
शिवछत्रपतींना पायदळाचे महत्व कळून चुकले होते. क्रमवरीनुसार मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदालची गतिशीलता घोडदळापेक्षा निस्चित कमी होती. परंतु शिवाजीराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. पायदल सैनिकांची भरती मुख्यत: मावळे आणि हेटकरी आणि इतरही काही लोकांमधून करण्यात येत असे. स्वता शिवाजीराजांतर्फे सैन्यभरती होत असे. प्रत्येक किल्ल्यात पायदाळच्या तुकड्या सज्ज असत. सर्वात लहान तुकडी 10 सैनिकांची असे.
पायदळाची रचना अशी होती :-
१० सैनिकांवर - १ नाईक
५ नाईकांवर - १ हवालदार
३ हवालदारांवर - १ जुमलेदार
१० जुमलेदरांवर - १ हजारी
७ हजारिंवर - सेनापती (सरनौबत)
महाराजांच्या सैन्याच्या पायदळत सुमारे १०५०० सैनिक होते.
पायदळतील जुमलेदारास १० होन प्रतिवार्षी मिळत तर सबनिसास ४० होन मिळत असत. हजारीस ५०० होन प्राप्ती होत असे.
पायदालचे मुख्य कार्य पर्वतीय आणि दुर्गम भागातील शत्रूशि लढण्याचे असे. सोबत त्यांना घोडेस्वरांचे सुध्हा रक्षण करावे लागत असे. पायदळात ठिकठीकाणहून गोळा केलेले अनेक नवशिके लोक होते. त्यांना युध्हाचे शिक्षण देण्याकरिता त्यांना उघड्या शेतात तीन महिने तळ ठोकावा लगे, वेल पडल्यास घोडेस्वारी, युध्कलेचे सर्व डाव कसे खेळावेत आणि लढाई कशी करावी या विषयी चे शिक्षण त्यांना काळजी पूर्वक दिले जात असे.
_एक आवाहन....
_
तुमच्या मनात जरा जरी
महाराजां बद्दल आदर असेल तर ,,,
एक आवाहनश्री.शिव छत्रपतिंनी जवळपास ३०० गडांवर राज्य केलेया पैकी बरेचसे गड त्यांनी स्वतःबांधवून घेतलेपण त्यांनी स्वतः एकही गडावर आपले नाव लहिले नाही .अगर कोरले नाही ,,,
मनात आणले असते तर त्यांना ते अवघड नव्हतेराज्यकर्ता असल्याने त्यांना तेसहज शक्य होतेपण स्वकर्तुत्वाने त्यांनी स्वतःचे नाव ईतिहासात अजरामर केलेपण ,,,
आम्ही कपाळ करंटेकुठे एखादा दगड पहिला कि लगेचमी मिळेल त्याने आपले नाव त्यावरलिहून ठेवतोमाझ स्वतःच अस वैयक्तिक अस आवाहनआहेकि कृपया त्या गडांच्या दगडांवर आपल नाव कोरून त्यालाविद्रूप करू नका तर स्वकर्तुत्वावर गडाचा निखळलेलाकिमान एक तरी दगड लावायचा प्रयत्न करातुमच्या मनात जरा जरी महाराजां बद्दल आदर असेल तरकृपया असला मूर्खपणा न करता त्यागडाचीजोपासना करा ,त्याच जतन करा ,
अधिका धिक लोकांना गड पाहायला उद्युक्त करात्यांना सांगागड- किल्ला का पाहायचा ?
त्यांना सांगाहे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत.त्यांना सांगाअंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत .त्यांना सांगातोफांचा मारा यांनी सहन केला आहे.त्यांना सांगाअनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत.त्यांना सांगाचला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ,
आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू.जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील,
आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेलतर...?
महाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीलाकरा बघा नक्की ती पुन्हा तुमच्याहाकेला ओ देईल,,,
एक तरी गड किल्ला फिरून बघाएकटे शिवाजी महाराज जर ईतका काहीकरू शकतात तर आपणात प्रत्येकातएक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..त्यांना सांगाजगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।
एक आवाहनश्री.शिव छत्रपतिंनी जवळपास ३०० गडांवर राज्य केलेया पैकी बरेचसे गड त्यांनी स्वतःबांधवून घेतलेपण त्यांनी स्वतः एकही गडावर आपले नाव लहिले नाही .अगर कोरले नाही ,,,
मनात आणले असते तर त्यांना ते अवघड नव्हतेराज्यकर्ता असल्याने त्यांना तेसहज शक्य होतेपण स्वकर्तुत्वाने त्यांनी स्वतःचे नाव ईतिहासात अजरामर केलेपण ,,,
आम्ही कपाळ करंटेकुठे एखादा दगड पहिला कि लगेचमी मिळेल त्याने आपले नाव त्यावरलिहून ठेवतोमाझ स्वतःच अस वैयक्तिक अस आवाहनआहेकि कृपया त्या गडांच्या दगडांवर आपल नाव कोरून त्यालाविद्रूप करू नका तर स्वकर्तुत्वावर गडाचा निखळलेलाकिमान एक तरी दगड लावायचा प्रयत्न करातुमच्या मनात जरा जरी महाराजां बद्दल आदर असेल तरकृपया असला मूर्खपणा न करता त्यागडाचीजोपासना करा ,त्याच जतन करा ,
अधिका धिक लोकांना गड पाहायला उद्युक्त करात्यांना सांगागड- किल्ला का पाहायचा ?
त्यांना सांगाहे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत.त्यांना सांगाअंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत .त्यांना सांगातोफांचा मारा यांनी सहन केला आहे.त्यांना सांगाअनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत.त्यांना सांगाचला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ,
आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू.जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील,
आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेलतर...?
महाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीलाकरा बघा नक्की ती पुन्हा तुमच्याहाकेला ओ देईल,,,
एक तरी गड किल्ला फिरून बघाएकटे शिवाजी महाराज जर ईतका काहीकरू शकतात तर आपणात प्रत्येकातएक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..त्यांना सांगाजगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।
महाराजांचे सुवर्ण सिंहासन......
_ राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांसाठी खास ३२ मण वज...नाचेसोन्याचे तयार करण्यात आले होते. हे सिंहासन पोलादपुर (जि. रायगढ) येथीलरामजी दत्तो चित्रे यांनी घडवले होते. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणितनवरत्ने जड्वलेली होती.आज सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल.त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते.२४ tole म्हणजे १ शेर (जुना तोला सध्याच्या ११.७५ ग्रामचा होता)१६ शेर म्हणजे १ मणम्हणजेच१ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोले = २८२ ग्राम होते.१ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते.असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो)सन्दर्भ : शिवचरित्र (बाबासाहेब पुरंदरे)
शिवचरित्र काय शिकवते?
१) आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे.वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
२) उठा जागे व्हा! थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही.
३) जीवनात चढउतार हे येत असतात.नेहमी हसत राहा.असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.
४) अहंकारापासून तितकेच सावध रहा,जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता.
५) प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या.प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ फार वेगाने पुढे जात आहे.म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबलाने कामाला लागा तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल.
६) कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुखिः, करून घेऊ नका.मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा,तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल.स्वतःच्या मानल नेहमी कामात गुंतवून ठेवा, त्याला मोकळे राहू देऊ नका.जीवन गांभीर्याने जगा तुमच्यासमोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे.आणि वेळ फार थोडाच आहे.बेसावधपणे तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुखिः व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल.
७) धैर्य व अशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल.तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा,आवश्यक वाटत असेल त्तर संपूर्ण जगाला आव्हान द्या,यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही.
८) थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करत आले आहेत आणि त्यांच्याच वाटेचे दुसर्यांनी अनुकरण केले आहे.
९) एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय.परंतु एकटेपणापासून घाबरणे,त्रागा करणे,कर्तव्यापासून विचलित होणे हे महा पाप होय.एकटेपण हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे.स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्टतम शक्तींना प्रकाशात आणू शकता.
१०) दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्श्वराच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो,परंतु या सुखी लोकांनी आपली कामे किती लक्षपूर्वक केली आहेत याकडे मात्र आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो,आमची जिद्द आमच्या अंगी आहे का ? याकडे आपण लक्ष्य द्यावे.ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही.त्याने आत्मबल सर्वांनाच मुक्त हाताने सधलपाने प्रदान केले आहे ; ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल.
वाचा.........विचार करा............अंतर्मुख व्हा.आणि खरोखरच आपण त्या !!निश्चयाच्या महामेरुचे!! गुण घेतो का याचाही विचार करा...............
निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु |अखंडस्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||
२) उठा जागे व्हा! थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही.
३) जीवनात चढउतार हे येत असतात.नेहमी हसत राहा.असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.
४) अहंकारापासून तितकेच सावध रहा,जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता.
५) प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या.प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ फार वेगाने पुढे जात आहे.म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबलाने कामाला लागा तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल.
६) कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुखिः, करून घेऊ नका.मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा,तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल.स्वतःच्या मानल नेहमी कामात गुंतवून ठेवा, त्याला मोकळे राहू देऊ नका.जीवन गांभीर्याने जगा तुमच्यासमोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे.आणि वेळ फार थोडाच आहे.बेसावधपणे तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुखिः व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल.
७) धैर्य व अशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल.तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा,आवश्यक वाटत असेल त्तर संपूर्ण जगाला आव्हान द्या,यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही.
८) थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करत आले आहेत आणि त्यांच्याच वाटेचे दुसर्यांनी अनुकरण केले आहे.
९) एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय.परंतु एकटेपणापासून घाबरणे,त्रागा करणे,कर्तव्यापासून विचलित होणे हे महा पाप होय.एकटेपण हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे.स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्टतम शक्तींना प्रकाशात आणू शकता.
१०) दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्श्वराच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो,परंतु या सुखी लोकांनी आपली कामे किती लक्षपूर्वक केली आहेत याकडे मात्र आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो,आमची जिद्द आमच्या अंगी आहे का ? याकडे आपण लक्ष्य द्यावे.ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही.त्याने आत्मबल सर्वांनाच मुक्त हाताने सधलपाने प्रदान केले आहे ; ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल.
वाचा.........विचार करा............अंतर्मुख व्हा.आणि खरोखरच आपण त्या !!निश्चयाच्या महामेरुचे!! गुण घेतो का याचाही विचार करा...............
निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु |अखंडस्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||
महाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास आणि मावळ्यांचे जबरदस्त प्रेम
स्वत: पूर्ण सावध राहून शत्रूला गाफील बनवायचं आणि त्याच्या गाफीलपणाचा पुरेपूर फायदा उठवायचा हा शिवाजीराजांचा डाव. हाच त्यांच्या बुद्धीबळाचा डाव. आपल्या वकीलाच्या मार्फत महाराज खानाला आपल्या चक्रव्यूहात गंुतवित चालले होते. खानाने प्रतापगडच्या पायथ्याशी यायचं मान्य केलं.
खरं म्हणजे इथं जावळीच्या जंगलात गडाच्या वाटेवर खान यायला कबूल झाला ही खानाची चूकच नाही का ? नाही. खानाला येणं भागच होतं. नाहीतरी तो दुसरं काय करू शकत होता ? त्याला शिवाजीराजा आपल्या मगरमिठीत हवा होता. त्याकरीता अखेर त्याला प्रतापगडावर हल्ला करण्याकरता तरी यावच लागलं असतं. त्याने सरळ विचार केला की , शिवाजी आपल्या भेटीसाठी गडावरून खाली यायला तयार होतोय. म्हणजेच आपण गडापर्यंत युद्ध न करताच , विना अडथळा जाऊन पोहोचू शकतोय तेही आपल्या फौजेसह. म्हणून खानाने ही फार मोठी अनुकूल गोष्ट घडणार आहे हे लक्षात घेऊन प्रतापगडाखाली यायचं ठरविलं.
यात त्याची काहीच चूक नाही. तो चुकला स्वत:च्याच गाफीलपणामुळे. राजकारण , दारुगोळ्याचं कोठार आणि तपोसाधना यांत किंचितही गाफील राहून चालत नाही. तपोभंग करायला केव्हा एखादी अप्सरा येईल याचा नेम नसतो. दारुगोळ्याचं कोठार उडवायला कुठून ठिणगी येईल याचाही नेम नसतो अन् राजकारणात एखादा चाणक्य , कृष्ण किंवा शिवाजीराजा केव्हा समोरच्याला उलथंपालथं करून टाकील याचाही नेम नसतो. खान याबाबतीत अत्यंत बेसावध राहीला. तेही स्वत:च्या मनात शिवाजीराजाचा विश्वासघाताने जीव घेण्याची इच्छा धरून.
खान वाईवरून महाबळेश्वराकडे निघाला. राजांना जिवंत किंवा ठार मारून कब्जात घ्यायचं अन् विजापुरला न्यायचं हे त्यानं अगदी निश्चित ठरविलं होतं.
या प्रतापगड कालखंडात महाराजांना अनेक मानसिक यातनांना तोंड द्यावे लागले होते. ते प्रतापगडावर राजकारणात व्यग्र असतानाच तिकडे राजगडावर त्यांच्या राणीसाहेब सईबाई या मृत्यू पावल्या. (दि. ५ सप्टेंबर १६५९ ) हे दु:ख सामान्य होतं का ? त्यांचा पुत्र संभाजीराजा हा अवघा दोन वर्षाचा होता. जिजाऊ साहेबांना चिंता आगीसारखी भाजून काढीत होती. आईची चिंता ही महाराजांना केवढी असहनीय होत होती. आईवर कमालीचं प्रेम करणारा हा पुत्र होता.
एक गोष्ट सर्वात चिंतेची होती , ती महाराजांच्यावर अपरंपार पेम करणाऱ्या मावळ्यांच्या मनस्थितीची. हे मावळे महाराजांवर रामायणातल्या हनुमंतासारखे अन् वानरदळासारखे प्रेम करीत होते. त्यांचा महाराजांना प्रथमपासूनच आग्रह होता की , ' महाराज , खानाला जातीने भेटू नका , धोका आहे. तो घात करील या डोंगरदऱ्यात खानाशी आम्ही झुंजतो. वर्षनवर्ष ही झुंजतो. पण तुम्ही त्या आगीत शिरू नका. '
मावळ्यांचे आणि सरदारांचे हे प्रेम अलौकीक होते. पण महाराजांचा डाव त्यामुळे अडखळत होता. शत्रूच्या जास्तीतजास्त फौजेचा आपल्या कमीतकमी फौजेनिशी , कमीतकमी वेळेत पूर्ण पराभव करण्याचा डाव महाराजांनी आखला होता. यावर हे सवंगडी म्हणत होते , ' हे जमलियास ठीक. पण न जमलियास कैसे होईल ?'
महाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास आणि मावळ्यांचे जबरदस्त प्रेम यांचा हा संघर्षच होता.
आणि महाराजांनी एका मध्यरात्री अर्धवट झोपेतून खडबडून उठून आपल्या या सरदारांना आपलं स्वप्नच सांगितलं. महाराजांचे शब्द असे , '' श्री भवानी आमच्या स्वप्नात आली. श्री आम्हांस बोलली की , ' लेकरा , त्याने (खानाने) माझा अपमान केला. त्वा काम काळजीने करावे. तुजला यश लाभेल. मीतर तुझी तलवारच होऊन राहिली आहे. ' श्री आम्हांस प्रसन्न झाली. ''
अन् मग अवघ्यांना पटलेचकी आता यश मिळणार. महाराजांनी जनतेच्या श्रद्धेचा केलेला हा अचूक उपयोग. श्रद्धा हे सार्मथ्य आहे. अंधश्रद्धा हे दौर्बल्य आहे. महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही अंधश्रद्धा ठेवली नाही. पण योग्य श्रद्धेचा आत्मबळ वाढविण्यासाठी असा उपयोग केला.
महाराजांनी खरोखरच आपल्या तलवारीचे नाव ' भवानी ' असे ठेवले.
खरंच महाराजांना स्वप्नात भवानीदेवी दिसली की ? ती बोलली का ? श्रीचं जाणे! पण स्वराज्यावर आलेलं भयंकर संकट या श्रीवरच्या सश्रद्धेनेच उधळलं गेलं. राज्य वाचलं , राजा वाचला. ध्वज वाचला हे मात्र सत्य. ज्याने त्याने आपल्या बुद्धीने आणि भावनेने निवाडा करावा.
मात्र महाराजांचे आणि सरदारांचे सर्व काम अत्यंत सावधपणे , शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध चालूच होते.
खरं म्हणजे इथं जावळीच्या जंगलात गडाच्या वाटेवर खान यायला कबूल झाला ही खानाची चूकच नाही का ? नाही. खानाला येणं भागच होतं. नाहीतरी तो दुसरं काय करू शकत होता ? त्याला शिवाजीराजा आपल्या मगरमिठीत हवा होता. त्याकरीता अखेर त्याला प्रतापगडावर हल्ला करण्याकरता तरी यावच लागलं असतं. त्याने सरळ विचार केला की , शिवाजी आपल्या भेटीसाठी गडावरून खाली यायला तयार होतोय. म्हणजेच आपण गडापर्यंत युद्ध न करताच , विना अडथळा जाऊन पोहोचू शकतोय तेही आपल्या फौजेसह. म्हणून खानाने ही फार मोठी अनुकूल गोष्ट घडणार आहे हे लक्षात घेऊन प्रतापगडाखाली यायचं ठरविलं.
यात त्याची काहीच चूक नाही. तो चुकला स्वत:च्याच गाफीलपणामुळे. राजकारण , दारुगोळ्याचं कोठार आणि तपोसाधना यांत किंचितही गाफील राहून चालत नाही. तपोभंग करायला केव्हा एखादी अप्सरा येईल याचा नेम नसतो. दारुगोळ्याचं कोठार उडवायला कुठून ठिणगी येईल याचाही नेम नसतो अन् राजकारणात एखादा चाणक्य , कृष्ण किंवा शिवाजीराजा केव्हा समोरच्याला उलथंपालथं करून टाकील याचाही नेम नसतो. खान याबाबतीत अत्यंत बेसावध राहीला. तेही स्वत:च्या मनात शिवाजीराजाचा विश्वासघाताने जीव घेण्याची इच्छा धरून.
खान वाईवरून महाबळेश्वराकडे निघाला. राजांना जिवंत किंवा ठार मारून कब्जात घ्यायचं अन् विजापुरला न्यायचं हे त्यानं अगदी निश्चित ठरविलं होतं.
या प्रतापगड कालखंडात महाराजांना अनेक मानसिक यातनांना तोंड द्यावे लागले होते. ते प्रतापगडावर राजकारणात व्यग्र असतानाच तिकडे राजगडावर त्यांच्या राणीसाहेब सईबाई या मृत्यू पावल्या. (दि. ५ सप्टेंबर १६५९ ) हे दु:ख सामान्य होतं का ? त्यांचा पुत्र संभाजीराजा हा अवघा दोन वर्षाचा होता. जिजाऊ साहेबांना चिंता आगीसारखी भाजून काढीत होती. आईची चिंता ही महाराजांना केवढी असहनीय होत होती. आईवर कमालीचं प्रेम करणारा हा पुत्र होता.
एक गोष्ट सर्वात चिंतेची होती , ती महाराजांच्यावर अपरंपार पेम करणाऱ्या मावळ्यांच्या मनस्थितीची. हे मावळे महाराजांवर रामायणातल्या हनुमंतासारखे अन् वानरदळासारखे प्रेम करीत होते. त्यांचा महाराजांना प्रथमपासूनच आग्रह होता की , ' महाराज , खानाला जातीने भेटू नका , धोका आहे. तो घात करील या डोंगरदऱ्यात खानाशी आम्ही झुंजतो. वर्षनवर्ष ही झुंजतो. पण तुम्ही त्या आगीत शिरू नका. '
मावळ्यांचे आणि सरदारांचे हे प्रेम अलौकीक होते. पण महाराजांचा डाव त्यामुळे अडखळत होता. शत्रूच्या जास्तीतजास्त फौजेचा आपल्या कमीतकमी फौजेनिशी , कमीतकमी वेळेत पूर्ण पराभव करण्याचा डाव महाराजांनी आखला होता. यावर हे सवंगडी म्हणत होते , ' हे जमलियास ठीक. पण न जमलियास कैसे होईल ?'
महाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास आणि मावळ्यांचे जबरदस्त प्रेम यांचा हा संघर्षच होता.
आणि महाराजांनी एका मध्यरात्री अर्धवट झोपेतून खडबडून उठून आपल्या या सरदारांना आपलं स्वप्नच सांगितलं. महाराजांचे शब्द असे , '' श्री भवानी आमच्या स्वप्नात आली. श्री आम्हांस बोलली की , ' लेकरा , त्याने (खानाने) माझा अपमान केला. त्वा काम काळजीने करावे. तुजला यश लाभेल. मीतर तुझी तलवारच होऊन राहिली आहे. ' श्री आम्हांस प्रसन्न झाली. ''
अन् मग अवघ्यांना पटलेचकी आता यश मिळणार. महाराजांनी जनतेच्या श्रद्धेचा केलेला हा अचूक उपयोग. श्रद्धा हे सार्मथ्य आहे. अंधश्रद्धा हे दौर्बल्य आहे. महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही अंधश्रद्धा ठेवली नाही. पण योग्य श्रद्धेचा आत्मबळ वाढविण्यासाठी असा उपयोग केला.
महाराजांनी खरोखरच आपल्या तलवारीचे नाव ' भवानी ' असे ठेवले.
खरंच महाराजांना स्वप्नात भवानीदेवी दिसली की ? ती बोलली का ? श्रीचं जाणे! पण स्वराज्यावर आलेलं भयंकर संकट या श्रीवरच्या सश्रद्धेनेच उधळलं गेलं. राज्य वाचलं , राजा वाचला. ध्वज वाचला हे मात्र सत्य. ज्याने त्याने आपल्या बुद्धीने आणि भावनेने निवाडा करावा.
मात्र महाराजांचे आणि सरदारांचे सर्व काम अत्यंत सावधपणे , शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध चालूच होते.
आमच्या शिवरायांचे वादळ
आमच्या शिवरायांचे वादळ अजून थोडा वेळ जरी घोंगावले असते तर,
त्यांनी हिंदुस्थानाच काय पण उभ्या जगालाच आपल्या कवेत घेतेले असते..
.
.
आमच्या शिवरायांच्या पराक्रमच्या तोफा अजून काही काळ जर धगधगत राहिल्या असत्या तर,
... त्यांनी आज सातासमुद्रापारही स्वराजाच्याच नौबती झाडल्या असत्या.
.
.
आमच्या शिवरायांसाठी नियती थोडी जरी सबुरीने वागली असती तर,
त्यांनी जमिनीवरच काय पण समुद्रावर हि हुकुमत गाजवली असती.
.
.
आमच्या शिवरायांची समशेर अजून थोडी जरी तळपली असती तर ,
आज ब्रिटेनच्या राणीनेहि "जय जिजाऊ जय शिवराय" ची आरोळी ठोकली असती.
.
.
आमच्या शिवरायांच्या आयुष्याचा दोर अजून थोडा मजबूत असता तर,
त्यांनी लाल किल्यावारच काय पण "व्हाईटहाउस"वरही भगवा झेंडा फडकवला असता. .
.
पण महाराजांच्या अकाली जाण्याने त्यांची स्वप्न स्वप्नेच राहिली.
आपल्यातील दुहीच्या शापाने ती कधीच नाही पूर्ण झाली.
.
.
आता तरी उठा मर्द मराठ्यानो एकीची वज्रमूठ बांधूया महाराजांच्या स्वप्नासाठी पुन्हा क्रांतीची मशाल पेटवुया.
त्यांनी हिंदुस्थानाच काय पण उभ्या जगालाच आपल्या कवेत घेतेले असते..
.
.
आमच्या शिवरायांच्या पराक्रमच्या तोफा अजून काही काळ जर धगधगत राहिल्या असत्या तर,
... त्यांनी आज सातासमुद्रापारही स्वराजाच्याच नौबती झाडल्या असत्या.
.
.
आमच्या शिवरायांसाठी नियती थोडी जरी सबुरीने वागली असती तर,
त्यांनी जमिनीवरच काय पण समुद्रावर हि हुकुमत गाजवली असती.
.
.
आमच्या शिवरायांची समशेर अजून थोडी जरी तळपली असती तर ,
आज ब्रिटेनच्या राणीनेहि "जय जिजाऊ जय शिवराय" ची आरोळी ठोकली असती.
.
.
आमच्या शिवरायांच्या आयुष्याचा दोर अजून थोडा मजबूत असता तर,
त्यांनी लाल किल्यावारच काय पण "व्हाईटहाउस"वरही भगवा झेंडा फडकवला असता. .
.
पण महाराजांच्या अकाली जाण्याने त्यांची स्वप्न स्वप्नेच राहिली.
आपल्यातील दुहीच्या शापाने ती कधीच नाही पूर्ण झाली.
.
.
आता तरी उठा मर्द मराठ्यानो एकीची वज्रमूठ बांधूया महाराजांच्या स्वप्नासाठी पुन्हा क्रांतीची मशाल पेटवुया.
मावळे तरी बनुया..
छत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात..
शिवरायांचे शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सुद्दीपणा, धाडस, दुर्दृष्टीपणा….
...
असे उच्च कोटीचे गुण शिवरायांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले दिसतात..
छत्रपती शिवरायांनी…
•बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वतः कष्ट घेतले
•पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला
•साध्या-भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला
•स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःला घट्टपणे बांधून घेतले
•महत्वाचे गड-किल्ले जिंकले तसेच नवनिर्माण केले
•योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कालाहाचाही सामना केला.
•आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला.
•सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकऱ्यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था…. अशा एक न अनेक व्यवस्था लावून दिल्या.
•सर्वात महत्वाचे म्हणजे शिवरायांनी अष्ठप्रधान मंडळाची स्थापना करून स्वराज्याच्या कारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली
•राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला, विविध कलांना राजाश्रय दिला. तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.
या सर्व गोष्टी शिवरायांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात….
पण आपण ?? आपण काय केले ????
सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते…. महाराष्ट्र धर्म वाढविण्याची स्फूर्ती देते.. आणि देताच राहील..
मित्रहो, आपण शिवराय बनणे तर शक्यच नाही किमान मावळे तरी बनुया..
एकदा महाराज मला भेटलेएकदा महाराज मला भेटले,
एकदा महाराज मला भेटलेएकदा महाराज मला भेटले,
झोपेत पाहून जोरात कडाडले ,
"अरे मावळ्या झोपतोस काय?,
कोम्ब्डा अरवला ऐकू येत नाही काय?",
"महाराज हयात दोष माझा नाय ,
थंड AC आणि गजराच्या युगात,
कोम्ब्डया च महत्व तरी काय?"
महाराज हसले अणि म्हणाले ,
"चल भवानी मातेच दर्शन घेउया,
ह्या युगातला महाराष्ट्र पाहुया"दर्शन घेउनी महाराजांनी सर्व किल्ले पाहिले,
शेवटी रायगडा वर येउनी स्तब्ध राहिले,
म्हणाले,"काय रे दशा झाली या किल्ल्यांच चीआज?
ज्यांना पाहुनी डगमगले होते पातशाही ताज!!!मी म्हणालो ,"महाराज,
अहो इथे इतिहास आठवतो तरी कुणाला आज?
रेव्ह पार्ट्या करतांना ह्या लोकांना वाटत नाही लाज...!महाराज विचलित झाले,
म्हणाले,"च ल येथून जाऊ यात ,
महाराष्ट्र ाची राजधानी पहुयात",
महाराजान्स ोबत मुंबईत आलो,
तिथल्या झगमगाटात पूर्णपणे हरवलो,
मुंबई बघता बघता २६/११ च प्रसंग ऐकविला,
तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या महाराजांनी मलाच प्रश्न केला,
"तुम्ही त्या नाराधामाला जित्ता कैसा सोडिला?"
उत्त्तर काय देणार माझाच चेहरा पडला ,
म्हणालो महाराज ,"तो पहा तो कसब त्यानेच हा प्रसंग घडविला,
पण आजच्या लोकशाहीत न्याय आहे प्रत्येकाल ा नाही तो फक्त माणुसकीला ....
!वरून आमचेच नेते म्हणती,तुम चेच लोक फितूर ,
बलिदान गेले वाया , मरणयास होते आतुर...
झोपेत पाहून जोरात कडाडले ,
"अरे मावळ्या झोपतोस काय?,
कोम्ब्डा अरवला ऐकू येत नाही काय?",
"महाराज हयात दोष माझा नाय ,
थंड AC आणि गजराच्या युगात,
कोम्ब्डया च महत्व तरी काय?"
महाराज हसले अणि म्हणाले ,
"चल भवानी मातेच दर्शन घेउया,
ह्या युगातला महाराष्ट्र पाहुया"दर्शन घेउनी महाराजांनी सर्व किल्ले पाहिले,
शेवटी रायगडा वर येउनी स्तब्ध राहिले,
म्हणाले,"काय रे दशा झाली या किल्ल्यांच चीआज?
ज्यांना पाहुनी डगमगले होते पातशाही ताज!!!मी म्हणालो ,"महाराज,
अहो इथे इतिहास आठवतो तरी कुणाला आज?
रेव्ह पार्ट्या करतांना ह्या लोकांना वाटत नाही लाज...!महाराज विचलित झाले,
म्हणाले,"च ल येथून जाऊ यात ,
महाराष्ट्र ाची राजधानी पहुयात",
महाराजान्स ोबत मुंबईत आलो,
तिथल्या झगमगाटात पूर्णपणे हरवलो,
मुंबई बघता बघता २६/११ च प्रसंग ऐकविला,
तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या महाराजांनी मलाच प्रश्न केला,
"तुम्ही त्या नाराधामाला जित्ता कैसा सोडिला?"
उत्त्तर काय देणार माझाच चेहरा पडला ,
म्हणालो महाराज ,"तो पहा तो कसब त्यानेच हा प्रसंग घडविला,
पण आजच्या लोकशाहीत न्याय आहे प्रत्येकाल ा नाही तो फक्त माणुसकीला ....
!वरून आमचेच नेते म्हणती,तुम चेच लोक फितूर ,
बलिदान गेले वाया , मरणयास होते आतुर...
_राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...
_राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...
आम्ही आज तुमचे किल्ले बघतो केवल मजेसाठी ...
तुमच्या मावळ्यानि कड़े चढले तुमच्या स्वप्नासाठी ...
आम्ही आड़वाटे नेही थकून जातो किल्ल्यावर जाण्यासाठी ...
तुमच्या सिंहाचे स्मारके आज युवकांचे दारूचे अड्डे ....
... सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्ट्याचे सडे...
मराठ्याच्या स्मराकांची हे हाल आता बघवत नाही ॥
मराठा असल्याचे किल्यावर गेल्यावर बोलवत नाही ...
आमची मक्का मदीना आज धुळी खाली गदली जात आहे ॥
कधी राज्य कर्त्यावर आज आरक्षण मागण्याची वेळ लादली जात आहे ॥
राज गड पासून ते राय गडा पर्यंत च्या आजही शोधाव्या लागतात वाटा॥
हया देशात राजे तुम्ही होतात म्हणुन आज होऊ शकले बिरला अन टाटा ...
शिर्डीच्या बाबाना सोंन्याचे सिंहासन अन छत्रपतीच्या समाधीला उन्हाच्या झळा...
मराठ्याचे मंत्री अन राजकर्ते शिव जयंतीला निधी करोडोचा करतात गोळा॥
राज्याच्या नावावर आज निघतात कित्तेक सेना ...
अन मराठी लोकांसाठी लढना-याचा नावावर दाखल होतो गुन्हा ...
राजे बर झाले तुम्ही लवकर गेले
नाहीतर हे दुखः तुम्हास सहन नसते झाले ॥
तुमच्या नावासाठी लढताना मेले ते तुमचे मावळे ॥
आज तुमच्या नावावर करतात राजकारण
अन भरतात आपली घरे ते आमचे डोम कवळे...
नशीब राजे गड तुम्ही डोंगरावर बांधले
जर असते कधी जमिनीवर तर
त्याचे सात बारा ह्यानी नक्कीच बदलले गेले असते॥
कवी ग्रीष्म करतो सगळ्याना एक विनंती रखा पावित्र्य गडाचे
आज नाहीतर शोधावे लागतील पुरावे आमच्या इतिहासाचे............
आम्ही आज तुमचे किल्ले बघतो केवल मजेसाठी ...
तुमच्या मावळ्यानि कड़े चढले तुमच्या स्वप्नासाठी ...
आम्ही आड़वाटे नेही थकून जातो किल्ल्यावर जाण्यासाठी ...
तुमच्या सिंहाचे स्मारके आज युवकांचे दारूचे अड्डे ....
... सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्ट्याचे सडे...
मराठ्याच्या स्मराकांची हे हाल आता बघवत नाही ॥
मराठा असल्याचे किल्यावर गेल्यावर बोलवत नाही ...
आमची मक्का मदीना आज धुळी खाली गदली जात आहे ॥
कधी राज्य कर्त्यावर आज आरक्षण मागण्याची वेळ लादली जात आहे ॥
राज गड पासून ते राय गडा पर्यंत च्या आजही शोधाव्या लागतात वाटा॥
हया देशात राजे तुम्ही होतात म्हणुन आज होऊ शकले बिरला अन टाटा ...
शिर्डीच्या बाबाना सोंन्याचे सिंहासन अन छत्रपतीच्या समाधीला उन्हाच्या झळा...
मराठ्याचे मंत्री अन राजकर्ते शिव जयंतीला निधी करोडोचा करतात गोळा॥
राज्याच्या नावावर आज निघतात कित्तेक सेना ...
अन मराठी लोकांसाठी लढना-याचा नावावर दाखल होतो गुन्हा ...
राजे बर झाले तुम्ही लवकर गेले
नाहीतर हे दुखः तुम्हास सहन नसते झाले ॥
तुमच्या नावासाठी लढताना मेले ते तुमचे मावळे ॥
आज तुमच्या नावावर करतात राजकारण
अन भरतात आपली घरे ते आमचे डोम कवळे...
नशीब राजे गड तुम्ही डोंगरावर बांधले
जर असते कधी जमिनीवर तर
त्याचे सात बारा ह्यानी नक्कीच बदलले गेले असते॥
कवी ग्रीष्म करतो सगळ्याना एक विनंती रखा पावित्र्य गडाचे
आज नाहीतर शोधावे लागतील पुरावे आमच्या इतिहासाचे............
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अखेरचे शब्द!!!!
आम्ही जातो, आमचा काल झाला,
तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा,
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा,
हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका.....
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अखेरचे शब्द!!!!
चैत्र शुक्ल पौर्णिमेला हिंदवी स्वराज्याचा शिवसुर्य माध्यान्हीला मावळला...
महाराजांना पुण्यतिथीच्या निमित्ताने त्रिवार वंदन...
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय !!
आम्ही जातो, आमचा काल झाला,
तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा,
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा,
हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका.....
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अखेरचे शब्द!!!!
चैत्र शुक्ल पौर्णिमेला हिंदवी स्वराज्याचा शिवसुर्य माध्यान्हीला मावळला...
महाराजांना पुण्यतिथीच्या निमित्ताने त्रिवार वंदन...
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय !!
छत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुन १६७४ रोजी झाला. शिवराय “छत्रपती” झाले. रयतेला आनंद झाला. सनई चौघडे वाजले. नगारे, नौबती वाजल्या. तोफा झडल्या. इकडे महाराजांची स्वारी दरबाराकडे निघाली. द्वारपालांचे इशारे झाले. गारदी पुढे सरसावले आणि महाराजांची गारद देण्यात आली.
*आस्ते कदम* *आस्ते कदम* *आस्ते कदम* *महाराsssssज* *गडपती* *गजअश्वपती* *भूपती* *प्रजापती* *सुवर्णरत्नश्रीपती* *अष्टवधानजागृत* *अष्टप्रधानवेष्टित* *न्यायालंकारमंडित* *शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत* *राजनितिधुरंधर* *प्रौढप्रतापपुरंदर* *क्षत्रियकुलावतंस* *सिंहासनाधिश्वर* *महाराजाधिराज* *राजाशिवछत्रपती* *महाराजांचा विजय असो.* *गारद म्हणजे काय ?* महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती तिला मराठीत *“गारद”* असे म्हटले जाते. गारदेला संस्कृतमध्ये *बिरुद* किंवा *बिरुदावली* तर ऊर्दु भाषेत *अल्काब* असे म्हणतात. *गारद कोण देतात ?* गारद देणाऱ्यांना गारदी म्हणतात. *छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ* *गडपती* – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असे महाराज. *गजअश्वपती* – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होता असे म्हणता येईल.) *भूपती प्रजापती* – वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज. *सुवर्णरत्नश्रीपती* – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवरायांच्या बाबतीत ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती.) *अष्टावधानजागृत* – आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज. *अष्टप्रधानवेष्टीत* – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज. *न्यायालंकारमंडीत* – कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज. *शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत* – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज. *राजनितीधुरंधर* – आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज. *प्रौढप्रतापपुरंदर* – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. *क्षत्रियकुलावतंस* – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज. *सिंहासनाधिश्वर* – जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. *महाराजाधिराज* – विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज. *राजाशिवछत्रपती* – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज. |
_अस्सल शिवकालीन साधनांची ओळख
_
मला असे वाटते जर अस्सल शिवकालीन साधनांची ओळख करून दिली तर अभ्यासकांना उपयोगी ठरेल. कादंबर्या वगैरे स्फूट साहित्य हे मनोरंजनासाठी ठीक, पण इतिहासासाठी मुळीच भक्कम साहित्य ठरू शकत नाही. त्यामुळे कथा - कादंबर्यांकडे अभ्यासू नजरेने बघितल्यास विचित्र इतिहासाची निर्मीती होते. अभ्यासूंसाठी शिवकालीन अस्सल साधनांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो आहे.
१) फार्सी पत्र संग्रह
१-अ) आदाब - इ - आलमगीरी (आलमगिरी शैली)
१-ब) इन्शा -इ हफ्त अंजुमन (सात प्रकारची पत्रे)
१- क) दुर्ज - उल गवाहिर (रत्नांचा करंडा)
१-ड) खुतूत - इ- शिवाजी (शिवरायांची पत्रे)
२) मराठी
२-अ) मराठ्यांच्या इतिहासाची साधने
(वि. का. राजवाडे संपादित खंड ८,१५, १६, १७,१८, २०)
२-ब) सभासद बखर (कृष्णाजी अनंत सभासद)
२-क) ९६ कलमी बखर
२-ड) चित्रगुप्त बखर
२- इ) तंजावरचा शिलालेख
२-फ) चिटणीस बखर
२-ह) शिवदिग्वीजय बखर
* शकावल्या
*-अ) जेधे शकावली
*-ब) शिवापूरकर देशपांडे शकावली
*-क) शिवापूर शकावली
*-ड) चित्रे शकावली
३) पोर्तुगीज
३-अ) द पोर्च्युगीझ अँड द मराठाज (डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर)
३-ब) मराठ्यांच्या इतिहासाची साधने : पोर्तुगीज दप्तर (डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर)
३-क) कोस्मि द ग्वार्दलिखित शिवचरित्र (१६९५)
४) इंग्रजी
४-अ) दि इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया, १७ खंड
४-ब) इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी, २ खंड
५) फार्सी साहित्य
५-अ) बादशाहनामा/ पातशाहनामा (शाहजहान कारकिर्द - १६२८ ते १६४७)
५-ब) आलमगिरनामा (औरंगजेबाची कालकिर्द)
५-क) मुहंमदनामा (मुहम्मद आदिलशाहाची कालकिर्द)
५-ड) तारीख - इ - आदिलशाही (आली आदिलशाहाचा इतिहास)
६) संस्कृत
६-अ) अनुपुराण उर्फ शिवभारत (कविंद्र परमानंद)
६-ब) पर्णालपर्वतग्रहणाख्यान (जयराम)
६-क) शिवराजराज्याभिषेककल्पतरू (गोविंद नारायण बर्वे)
७) समकालीन पोवाडे
७- अ) यमाजीकृत बाजी पासलकरांचा पोवाडा
७- ब) अज्ञानदासकृत अफजलखानवधाचा पोवाडा
७- क) फतनजीकृत अफजलखानाचा पोवाडा
७- ड) अज्ञान यमाजी कृत दत्ताजी जाधवरावांचा पोवाडा
८) हिंदी
८ -अ) शिवभूषण (कवि भूषण)
८ -ब) शिवा बावनी (कवि भूषण)
मला असे वाटते जर अस्सल शिवकालीन साधनांची ओळख करून दिली तर अभ्यासकांना उपयोगी ठरेल. कादंबर्या वगैरे स्फूट साहित्य हे मनोरंजनासाठी ठीक, पण इतिहासासाठी मुळीच भक्कम साहित्य ठरू शकत नाही. त्यामुळे कथा - कादंबर्यांकडे अभ्यासू नजरेने बघितल्यास विचित्र इतिहासाची निर्मीती होते. अभ्यासूंसाठी शिवकालीन अस्सल साधनांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो आहे.
१) फार्सी पत्र संग्रह
१-अ) आदाब - इ - आलमगीरी (आलमगिरी शैली)
१-ब) इन्शा -इ हफ्त अंजुमन (सात प्रकारची पत्रे)
१- क) दुर्ज - उल गवाहिर (रत्नांचा करंडा)
१-ड) खुतूत - इ- शिवाजी (शिवरायांची पत्रे)
२) मराठी
२-अ) मराठ्यांच्या इतिहासाची साधने
(वि. का. राजवाडे संपादित खंड ८,१५, १६, १७,१८, २०)
२-ब) सभासद बखर (कृष्णाजी अनंत सभासद)
२-क) ९६ कलमी बखर
२-ड) चित्रगुप्त बखर
२- इ) तंजावरचा शिलालेख
२-फ) चिटणीस बखर
२-ह) शिवदिग्वीजय बखर
* शकावल्या
*-अ) जेधे शकावली
*-ब) शिवापूरकर देशपांडे शकावली
*-क) शिवापूर शकावली
*-ड) चित्रे शकावली
३) पोर्तुगीज
३-अ) द पोर्च्युगीझ अँड द मराठाज (डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर)
३-ब) मराठ्यांच्या इतिहासाची साधने : पोर्तुगीज दप्तर (डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर)
३-क) कोस्मि द ग्वार्दलिखित शिवचरित्र (१६९५)
४) इंग्रजी
४-अ) दि इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया, १७ खंड
४-ब) इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी, २ खंड
५) फार्सी साहित्य
५-अ) बादशाहनामा/ पातशाहनामा (शाहजहान कारकिर्द - १६२८ ते १६४७)
५-ब) आलमगिरनामा (औरंगजेबाची कालकिर्द)
५-क) मुहंमदनामा (मुहम्मद आदिलशाहाची कालकिर्द)
५-ड) तारीख - इ - आदिलशाही (आली आदिलशाहाचा इतिहास)
६) संस्कृत
६-अ) अनुपुराण उर्फ शिवभारत (कविंद्र परमानंद)
६-ब) पर्णालपर्वतग्रहणाख्यान (जयराम)
६-क) शिवराजराज्याभिषेककल्पतरू (गोविंद नारायण बर्वे)
७) समकालीन पोवाडे
७- अ) यमाजीकृत बाजी पासलकरांचा पोवाडा
७- ब) अज्ञानदासकृत अफजलखानवधाचा पोवाडा
७- क) फतनजीकृत अफजलखानाचा पोवाडा
७- ड) अज्ञान यमाजी कृत दत्ताजी जाधवरावांचा पोवाडा
८) हिंदी
८ -अ) शिवभूषण (कवि भूषण)
८ -ब) शिवा बावनी (कवि भूषण)
<script type="text/javascript" language="javascript">
var aax_size='728x90'; var aax_pubname = 'uttamsiddha07-21'; var aax_src='302'; </script> <script type="text/javascript" language="javascript" src="http://c.amazon-adsystem.com/aax2/assoc.js"></script> |
|