"..माझा कान धरायचा अधिकार केवळ शिवाजी महाराजांना आहे..बाकी कोणालाही नाही.." सावरकर
मी जाणिवपूर्वक विधान करतो की शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेनानी होते. जगात तुलना नाही असे राजे होते..."
महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे सेनानी पराभूत केले त्यातले फक्त दोघेच भारतीय होते.
बाकी सगळे परकीय होते. त्यांच्या त्यांच्या देशाचे मानांकित सेनानी होते..... शिवरायांनी पराभूत केलेले सेनानी पाहु - ज्याची लाल महालात बोटं छाटली तो शाहिस्तेखान तो अबु-तालिबानचा नबाब, तुर्कस्तानचा नबाब आहे. तो प्रतिऔरंगजेब या नावाने ओळखला जायचा, औरंगजेबाचा सक्खा मामा आहे तो. बंगाल प्रांत जिंकुन दिलाय त्याने.. असा बलाढ्य सेनानी महाराजांनी एका रात्रीत तीन बोट छाटली.... पहाट व्हायच्या आत गायब झाला तॊ पुन्हा नाही आला... तो बहलोलखान पठाण सिकंदर चिडरखान पठाण हे सगळे पठाण अफगाणी आहेत. अफगाणीस्तानचे आहेत हे.. तो दिलेरखान.. मंगोलियन आहे तो, बाबा... मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योद्धा... महराजांनी त्याचा पराभव केला. सिद्धि जौहर, सिद्धी सलाबत खान हे सगळे इराणी आहेत. इराण चे आहेत सर्वोत्तम योद्धे आहेत महाराजांनी त्यांचा पराभव केला. आणि इथं लोणावळ्याच्या उंबरखिंडीत ज्याचा कोंडून पराभव केला...असा की गिनिज बुकला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागली की जगातल्या सगळ्यात कमी सैन्याने जास्तित जास्त सैन्याचा पराभव केला ( एक हजार विरुद्ध 30 हजार आणि 30 हजारंचा संपूर्ण पराभव 1000 मधला एकही मावळा न गमावता ) तो कहार्तलब खान तो उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे त्याचा पराभव केला. इंग्रज-गवर्नर लिहितो की शिवाजी महाराज जर अजून 10 वर्षे जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्तानचा नीट चेहरा पाहता सुध्दा आला नसता... सतराव्या शतकात लंडन मध्ये 3 वृत्तपत्रे प्रकाशीत होत होती. त्यामध्ये लंडन गॅझेट नावाचं वृत्तपत्र होत . शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याहून निसटले त्यावेळी या लंडन गॅझेट मध्ये पहिल्या पानावर ती बातमी छापून आलेली. त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ स्वराज्या असा नव्हता, किंग ऑफ मराठा असाही नव्हता.... तर त्यात माझ्या राजांचा उल्लेख Shivaaji the king of India असा होता... व्हियेतनाम नावाचे छोटसं राष्ट्र आहे हो राष्ट्रचं, आपल्या पुणे जिल्ह्याएवढेपण नसेल. व्हिएतनामचं आत्ताची महासत्ता अमेरिकेसोबत गेली 35 वर्षे युद्ध सुरू होते. पण या युध्दात अमेरिकेला विजय मिळाला नाही. का माहितीये कारण-- त्या व्हिएतनामच्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.... त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्यसेनानी "हू जी मीन" नांव त्याचे. त्याच्या समाधीवर लिहून ठेवलंय शिवाजी महाराजांचा एक मावळा येथे चीरविश्रांती घेतोय.... अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" या विषयावर 100 मार्काँचा पेपर घेतला जातो. जगातली 112 राष्ट्र शिवरायांच्या गोरील्ला warfair (युधतंत्र) चा वापर आपल्या अभ्यासक्रमात करतात. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. मी म्हणालो आता तूच सांग सगळं जग शिवरायांचा अभ्यास करतंय तिथं माझ्या देशातल्या अभ्यासक्रमात किती वेळा शिवरायांचा उल्लेख आहे ? तुम्ही इतिहास शिकलात त्या CBSC मध्ये 1700 पानांचे पुस्तक काढलंय. त्यात फक्त 4 ओळी आहेत शिवाजी महाराजां बद्दल म्हणून तुला ही माहिती नव्हती... म्हणुन तुम्ही असं म्हणालात... औरंगजेबाने आयुष्यातीलं ऐन उमेदीची २७ वर्ष तब्बल.... हो २७ वर्ष या महाराष्ट्रात मराठ्यांशी निकाराची झुंज देण्यात वाया घालवली. त्याने हिच २७ वर्ष इतर कुठल्याही ठिकाणी घालवली असती तर कदाचीत ही अर्धी पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली आली असती... इतक्या प्रचंड शक्तीशाली फौजेचा तो बादशाह होता पण मराठ्यांनी त्याला दिल्लीचे तख्त पुन्हा पाहु दिले नाही... कारण अख्ख्या जगाला माहिती आहे..की छत्रपती शिवाजी महाराज काय होते. पण भारतातील लोकांनाच माहित नाही..... |
|
आपल्या प्रजेवर लेकरांसारखं प्रेम केलं आहे............
अफजल खानाचा कोथळा बाहेरकाढल्या नंतरमहाराजांची योजना होती की लगेचगडाच्या दरवाज्या कडे धाव घ्यायची.महाराजांनी वाघनखे खुपसली,कोथला काढला. सय्यदबंडा आला जिवा महालांनी त्याला ठारकेलं. क्रुष्णाजी भास्कर अडवा आला,महाराजांनी त्याला कापला आणी प्रतापगडाच्या दरवाज्याकडेपळत सुटले.जाता जाता सोबतचे अंगरक्षक मोजुलागले...१,२,३,४,५,६,७,८ ,९फक्त ९?सोबत तर दहा होते... मग कोणबाकी राहिलं राजांनी विचारलं...कोणी तरी म्हटलं,'संभाजी कावजी नाही जी'राजे म्हणाले,'नाही? काय झालं? मधुनच कुठेगेला?'तेवढ्यात संभाजी कावजी धापा टाकतआला. राजे संतापले आणी म्हणाले,'संभाजी कुठे होतास?'संभाजी कावजी म्हणाला,'राजं तुम्ही वाघनख मारली खानाला पणम्हटलं मरत्यो की न्हाई म्हणुन मागेगेलो आणी त्याचं शीर कापुन आनलं'आणी त्यानी कापुन आनलेलं खानाचं डोकंवर केलं राजांना दाखवायला...राजे म्हणाले,'अरेगड्या त्या वाघनखांना विष लावलं होतं.खान कसाही करुन मरणारच होता मग तू हेवेडं धाडस का केलं. यापुढे लक्षात ठेव जेआपल्या योजनेत नाही ते कधिही करायचंनाही.एक वेळेस खान मेला नसता तरी चाललं असतंपण जर तुझ्या जिवाला काही बर वाईटझालं असतं तर तुझ्या आईला काय तोंडदाखवलं असतं मी. ती तर हेचम्हटली असती ना की शिवाजी नेस्वत:चा जीववाचवण्यासाठी माझ्या पोराचा जीवघालवला. तुझ्या जागेवर एक वेळेसमी मेलो असतो तर चाललं असतं पणस्वराज्याचा एकही मावळा मरता कामा नये.'जागाच्या पाठीवर पहिला राजा आहेजो आपल्या एका साध्या अंगरक्षासाठी सुद्धा मरायला तयारआहे. आपल्या प्रजेवर लेकरांसारखं प्रेम केलंआहे ह्या राजानी...
असे आमचे शिवराय चारित्र्यवान........
''कल्याणच्या खजिण्याच्या लुटीत एक मान
तरुणी लाभली रुपाची खान
तिला दिला सन्मान
तिला मानलं माते समान
असा परस्त्रिचा केला बहुमान
असे आमचे शिवराय चारित्र्यवान''
जय जिजाऊ जय शिवराय .!!------------
तरुणी लाभली रुपाची खान
तिला दिला सन्मान
तिला मानलं माते समान
असा परस्त्रिचा केला बहुमान
असे आमचे शिवराय चारित्र्यवान''
जय जिजाऊ जय शिवराय .!!------------
ताई ... कोण म्हटले मी तुम्हाला मारणार
ताई ... कोण म्हटले मी तुम्हाला मारणार ... या बाळाला मारणार ... मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला.
आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय... काही तरी दिले पाहिजे ना...
ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय... आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..
अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .
. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.
राजा.. मी तुला शञू समजले..
मी वैरी समजले..
पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला...
धन्य शिवाजी राजा.
आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय... काही तरी दिले पाहिजे ना...
ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय... आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..
अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .
. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.
राजा.. मी तुला शञू समजले..
मी वैरी समजले..
पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला...
धन्य शिवाजी राजा.
काय म्हणावे या राजेंच्या जिद्दीला -
जंजिरा मिळाला नाही ,तरी त्यांची खंत करत न बसता दुसरा जंजिरा निर्माण करणाऱ्या त्या जिद्दीला राजे शिवराय स्मरण करावे.-
जिंजीरा भेटत नाही म्हणून खंत न करता ..आरमार चे महत्व ओळखून राजेंनी त्या काळी सिंधुदुर्ग ,विजयदुर्ग ,पद्म दुर्ग या सारखे आरमार उभे केले हि काय सोपी गोष्ट नाहीये.. असे खंबीर आरमार तयार केले कि जे पुढे अरबी समुद्रात इग्रजना हि भारी पडले .
राजे चे एक वाक्य
ज्याचा दर्या ,त्याचे वैभव
ज्याचे आरमार, त्याचा समुद्र ..
“व्यापार हवा ,वैभव हवे ,तर समुद्र ताब्यात हवा .ह्या सूत्र समजून त्यांनी आरमार स्थापन केले .हे सूत्र पुढे पेशवे, मराठे विसरले त्यामुळे इग्रजनी हिन्दुस्तान बळकावला आणि आज २६/११ सारखे मुंबईवर हल्ले..
मी जो फोटो upload केला आहे त्या वरील वाक्य वाचा ..अप्रतिम आहे.
राजे नी पद्मदुर्गवरून जंजिरा पाहून काढलेली त्या वेळची ती शब्द असावीत असे भासते...
उत्तम य. सिद्ध
जिंजीरा भेटत नाही म्हणून खंत न करता ..आरमार चे महत्व ओळखून राजेंनी त्या काळी सिंधुदुर्ग ,विजयदुर्ग ,पद्म दुर्ग या सारखे आरमार उभे केले हि काय सोपी गोष्ट नाहीये.. असे खंबीर आरमार तयार केले कि जे पुढे अरबी समुद्रात इग्रजना हि भारी पडले .
राजे चे एक वाक्य
ज्याचा दर्या ,त्याचे वैभव
ज्याचे आरमार, त्याचा समुद्र ..
“व्यापार हवा ,वैभव हवे ,तर समुद्र ताब्यात हवा .ह्या सूत्र समजून त्यांनी आरमार स्थापन केले .हे सूत्र पुढे पेशवे, मराठे विसरले त्यामुळे इग्रजनी हिन्दुस्तान बळकावला आणि आज २६/११ सारखे मुंबईवर हल्ले..
मी जो फोटो upload केला आहे त्या वरील वाक्य वाचा ..अप्रतिम आहे.
राजे नी पद्मदुर्गवरून जंजिरा पाहून काढलेली त्या वेळची ती शब्द असावीत असे भासते...
उत्तम य. सिद्ध
तुझ्या स्वर्गाची दारे उघडी ठेव देवा
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु झाल्याची बातमी जून १६८० मध्ये औरंगजेबाच्या खाजगी सचिवास समजली. हिअसे आहेत आपले शिवराय महान ज्यांचा त्यांचे दुश्मन सुद्धा आदर करत असत त्याचे एक उदाहरण-
बातमी अत्यंत आनंदाची आहे,असे समजून सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत सांगण्यासाठी गेला.ही बातमी ऐकून औरंगजेब बादशहाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवले.तख्तावरूनउठला. त्याने सचिवास आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली.नमाजाची पोझिशन घेऊन त्याने दोन्ही हात पसरून आभाळाकडे अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले औरंगाजेबाने प्रार्थना केली.
तिचा मराठा अनुवाद -"हे देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. आमच्या हिँदूस्थानातील महान मानवतावादी व सर्वधर्म जातीतील स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू झाला आहे. कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची दारे उघडी ठेव देवा.."
संदर्भ - अहेकामे आलमगिरी
बातमी अत्यंत आनंदाची आहे,असे समजून सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत सांगण्यासाठी गेला.ही बातमी ऐकून औरंगजेब बादशहाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवले.तख्तावरूनउठला. त्याने सचिवास आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली.नमाजाची पोझिशन घेऊन त्याने दोन्ही हात पसरून आभाळाकडे अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले औरंगाजेबाने प्रार्थना केली.
तिचा मराठा अनुवाद -"हे देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. आमच्या हिँदूस्थानातील महान मानवतावादी व सर्वधर्म जातीतील स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू झाला आहे. कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची दारे उघडी ठेव देवा.."
संदर्भ - अहेकामे आलमगिरी
"..माझा कान धरायचा अधिकार केवळ शिवाजी महाराजांना आहे..बाकी कोणालाही नाही.." सावरकर
छत्रपती शिवाजी महाराजांचे उभे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मला राज्यघटना लिहताना ज्यास्त कष्ट घ्यावे लागले नाहित. बाबासाहेब आंबेडकर -भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर.
प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचचे नाव मी कधीच बदलणार नाही. --कर्मवीर भाऊराव पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांचे उभे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मला राज्यघटना लिहताना ज्यास्त कष्ट घ्यावे लागले नाहित. बाबासाहेब आंबेडकर -भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर.
प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचचे नाव मी कधीच बदलणार नाही. --कर्मवीर भाऊराव पाटील
जनतेच्या सच्च्या पुढार्याजवळ जी देशातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींना आपल्या कड़े आकर्षित करण्याची शक्ती असते ती छत्रपति शिवरायां कडे मोठ्या प्रमाणात होती. अशी शक्ती लुटारूंकडे वा धर्मवेड्या पुढार्याजवळ नसते. वर्ग, जात, धर्मं, पंत यांना दूर सारून समाजातील सर्व सर्वोत्कृष्ट माणसे महाराजान भोवती गोळा असत. कारण समाजाच्या आशा- आकांक्षांचे अगदी उत्कृष्ट स्वरूपा मधे छत्रपति शिवराय प्रतिनिधित्व करत होते. - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे.
राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब याच्यां चरणी मानाचा मुजरा..
“मासाहेब, उद्या आम्ही खान भेटीला जाऊ. जगदंबा आमच्या पाठीशी आहेच पण काही बरं वाईट झाले तर आपले राज्य …”
“शिवबा………..
“तुम्ही काळजी करू नका. जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर आम्ही समजून जाऊ कि आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या चिंतेने तुमचा धीर खचून जाता काम नये “
जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात .
“शिवबा………..
“तुम्ही काळजी करू नका. जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर आम्ही समजून जाऊ कि आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या चिंतेने तुमचा धीर खचून जाता काम नये “
जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात .
स्थापत्य अभियंता "श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता) असा engineer जगात होणे नाही .
स्थापत्य अभियंता "श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता) असा engineer जगात होणे नाही.. आत्ताच्या कोणत्याही सिविल इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. कि जो आपल्या उभारणीचा पुरावा देतो.आताही तो रायगड पाहायला भेटतो .असे फक्त शिवकाळात होऊ शकते...आणि त्या शिलालेख प्रमाणे आज हि रायगड पाहायला भेटतो.
जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेला शिलालेख:- ।। श्री गणपतयेनमः ।। ।। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनु ।। ।। ज्ञया श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।। ।। शाके षण्नव बाणभुमिगणनादानंद संवत्सरे ज्योतिराज ।। ।। मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्प्ये तिथौ ।। १ ।। वापीकूपतडागराजिरू ।। ।। चिरं हर्म्येर्वनंवीथिको स्तंभैः कुंभिगृहैनरेंद्रसदनै ।। ।। र्मिहिते श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजीना निर्मितो ।। ।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।। अर्थ :- सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद सिंहासनाधीश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मधे आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या श्रीमद रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, घरे, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, उंच राजगृहे अशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेपर्यंत नांदो ll आज अभियंता दिवस या निमित्ताने शिवकाळातील बांधकाम क्षेत्राला उच्चपातळीवर घेवुन जाणार्या ह्या अभियांत्यांना मानाचा मुजरा….. |
अशी निसंदिग्धता व त्यानुसार वर्तन हा शिवाजीमहाराजांचा फार मोठा गुण मला वाटतो.
राज्य स्थापन करणे हा महाराजांचा गुण होताच; पण राज्य स्थापन केल्यावर ते चालवायचे कसे, याचा स्पष्ट कार्यक्रम त्यांनी तरुणपणातच तयार केला होता. हे त्यांचे वैशिष्टय़ आगळेवेगळे आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वतची मुद्रा घडविली. ती पुन्हा कधीही बदलावी लागली नाही. त्यामध्ये भर घालावी लागली नाही. फेरफार करावा लागला नाही. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, याबद्दलची इतकी स्पष्ट कल्पना अन्य कुणा ऐतिहासिक व्यक्तीमध्ये आढळून येत नाही. अशी निसंदिग्धता व त्यानुसार वर्तन हा शिवाजीमहाराजांचा फार मोठा गुण मला वाटतो..’
................................मेहेंदळे
................................मेहेंदळे
मिरवणुकीसाठी हत्ती लागतील याचा विचार छ.शिवरायांनी आधीच करून ठेवला होता....
हा फोटो छ.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या मिरवणुकीचा आहे.या मिरवणुकीसाठी हत्ती लागतील याचा विचार छ.शिवरायांनी आधीच करून ठेवला होता.छ.शिवरायांच्या सैन्यात हत्तींचा वापर होत नसे.हत्तीचा वापर केवळ शोभेसाठी होत होता.त्याकाळी रायगड किल्ल्यावर जाण्यासाठीचा मार्ग अतिशय अरुंद होता जेथून माणसालासुद्धा चालणे फार अवघड होते.जर त्या रस्त्यावरून कुणी खाली पडले तर त्याचे प्रेतसुद्धा मिळणे अशक्य होते इतकी खोल दरी तेथे होती. अशा अरुंद रस्त्यावरून एवढे अवाढव्य हत्ती कसे काय रायगडावर पोहोचले हे त्याकाळच्या इंग्रज अधिकाऱ्याला (जो राज्याभिषेकासाठी हजार होता) कळलेच नाही.नंतर फार जास्त विचारपूस केल्यावर कळले की छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या १८ वर्षे अगोदरच दोन हत्तीचे पिल्ले (एक नर एक मादा )कर्नाटक वरून उन्हाळ्याच्या काळात बोलाविले होते.त्यांना छ.शिवरायांचा एक माणूस रोज हिरवा चारा द्यायचा.तेथील वाळलेला चारा खायची त्या हत्तींना सवय लागू दिली नाही.नंतर काही दिवसांनी हाच माणूस हिरवा चारा त्याच्या डोक्यावर घेऊन फिरायचा आणि ते हत्ती भूकेपोटी त्या चाऱ्याच्या मागे फिरायचे.थकल्यावर त्यांना तो चारा मिळायचा.एक दिवस त्या माणसाने तो हिरवा चारा डोक्यावर घेऊन रायगडाच्या अरुंद पायवाटेने चालायला सुरुवात केली.ते दोनीही हत्ती चारयाकडे बघत बघत त्याच अरुंद पायवाटेवरून चालू लागले.त्यांचे लक्ष केवळ त्या चारयाकडे होते.खाली असलेली जीवघेणी खोल दरी त्यांना दिसून चक्कर येऊन त्यांचा खाली पडण्याचा प्रश्नच तेव्हा उरला नव्हता.असे आपल्या अन्नाकडे बघत बघत ते दोनीही हत्तीचे पिल्ले रायगडावर पोहोचले.त्याच दोन हत्तींचे प्रजनन होऊन जे हत्ती पुढे जन्मले त्यापैकी काही मरण पावले आणि फक्त चार उरले त्याच हत्तींवर छ.शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली होती.एवढा दूरदृष्टीकोन ठेवणारे आपले छ.शिवाजी महाराज खरोखर महान होते.त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही दूरदृष्टीकोन ठेऊन आपले जीवन समृद्ध करूया .....................................छ.शिवाजी महाराज की जय..........
संदर्भ - शिवमुद्रा
संदर्भ - शिवमुद्रा
"ईतिहासाची पाने चाळतांना"
शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही.......
शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवरशी करत बसले नाहीत.
ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले............
गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण कधी घातला नाही.......
अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे.
माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या.
असे कीतीतरी
विज्ञानवादी व दैववादाला मुठमाती देणारे उदाहरणे देता येतील.
महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.....
शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवरशी करत बसले नाहीत.
ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले............
गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण कधी घातला नाही.......
अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे.
माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या.
असे कीतीतरी
विज्ञानवादी व दैववादाला मुठमाती देणारे उदाहरणे देता येतील.
महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.....
कदाचित हि मूर्ती रायगड वर असती..
रायगड वरती बसवण्यासाठी दोन मूर्ती तयार केल्या होत्या एक लहान आणि एक मोठी ...त्यातील एक आता लहान मूर्ती रायगडवरील होळीचा माळ वरती आहे..आणि मोठी आता ह्या फोटो मध्ये आहे. हि मोठी मूर्ती हेलिकॉप्टर नी उचलून रायगड वर आणायची होती..पण त्यावेळी हि मोठी मूर्ती हेलिकॉप्टरला उचलणे शक्त झाले नाही..म्हणून आता रायगड वरती जी लहान मूर्ती आहे तीला रायगडवरती होळीचा माळ येथे स्थापन करण्यात आली..हि मोठी मूर्ती बेळगाव मध्येच स्थापन करण्यात आली..त्यावेळी जर हेलिकॉप्टर ने हि मूर्ती उचलली असती तर..कदाचीत आज हि मूर्ती रायगड वर दिसली असती....
---उत्तम सिद्ध
नवस केल्याची एकही नोंद सापडत नाही |
|
शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांनी देवाला किंवा देवीला नवस केल्याची एकही नोंद सापडत नाही. व्यक्तिगत स्वत:च्या सुखदु:खासाठी किंवा स्वराज्याच्या अवघड सवघड कामगिऱ्या फत्ते व्हाव्यात , आग्ऱ्याच्या कैदेतून सुटावं , सिद्दी जौहरच्या वेढ्यातून पार व्हावं अशा गोष्टींसाठीही महाराजांनी कधी नवस केल्याची नोंद मिळत नाही. त्यांचं मन अत्यंत श्रद्धावंत होतं. पण अंधश्रद्धावंत नव्हतं. ते भावनाशील होते. पण भावनाप्रधान नव्हते. ते स्वकष्टाने , तपश्चयेर्ने यशे मिळवीत होते. नवसासायासांनी नव्हे
जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात.
मासाहेब, उद्या आम्ही खान भेटीला जाऊ. जगदंबा आमच्या पाठीशी आहेच पण काही बरं वाईट झाले तर आपले राज्य ..."
"शिवबा...........
"तुम्ही काळजी करू नका. जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर आम्ही समजून जाऊ कि आम्ही आधीपासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्यामुळे तुमचा धीर खचून जाता कामा नये "
जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात.
महाराजांनी जावळी मारली आणि विजापूरची आदिलशाही पार थरारून गेली. सह्याद्रीचा हा वाघ आता डोईजड झाला होता. ह्याचा बंदोबस्त करणे म्हणजे काळाची गरज झाली होती. म्हणून बड्या बेगमने भर दरबारात आवाहन केले - ''कोण? कोण जाईल सह्याद्रीच्या त्या गुहेत? कोण पकडेल त्या वाघाला?'' सगळ्यांची जुबान बंद, डोळे जमिनीचे वेध घेत, मुंड्या खाली झुकल्या होत्या. बडी बेगम आग ओकत होती," ऐसा कोई माईका लाल नही, ऐसा एक भी मर्द नही इस बिजापुर दरबार में?" उत्तर काही येत नव्हते. पानाचे विडे जसे होते तसे तबकात निपचित पडले होते.
"हम जायेंगे बेगम साहिबा" कोण? कोण? कोण? सगळ्यांच्या माना मागे वळत होत्या. नक्की आवाज आला कुणाचा?
तो तोच ज्याने फर्जंद शहाजी राजांना कैद केले.
तो तोच ज्याने संभाजी राजांना दगा करून मारले.
तो तोच ज्याची औरंगजेबला पकडण्यापर्यंत मजल गेली.
आडवा तिडवा धिप्पाड अंगाचा, प्रचंड बुरुजासारखा, जसा राक्षसी देहाचा तसाच राक्षसी मनाचा.
... अफजल खान
उचलला विडा, आणि कोसळला महाराष्ट्रावर.
रक्ताचा सडा शिंपून उभे केलेले शिवार हा भस्मासूर पायदळी तुडवत निघाला, देव फोडले, मंदिरे नासवली, बाटवली. आता शिवाजी बाहेर पडेल असा त्याचा डाव. पण राजे लवकर बाहेर येईनात. इकडे खानाने रयत मारावयास सुरवात केली.
महाराजांनी राजगड सोडला व प्रतापगड जवळ केला. तो मृत्यूला घाबरून म्हणून नाही, तर राजगड ते प्रतापगड हा स्वराज्याचा बहुतांश भाग राजांनी अफझलखानपासून वाचवला. त्यात तो परिसर अतिभयाण. प्रतापगडाला जाण्यासाठी त्यावेळी एकच वाट होती. ती म्हणजे रणतोंडीची वाट. ज्या वाटेवरून जाताना तोंड रडल्याखेरीज राहत नाही अशी ती वाट.
खानाने घाईने वाई जवळ केली. खानाचे चाळीस हजाराचे सैन्य वाईच्या पसरणी घाटात पसरले. खानने राजांना खलिता पाठविला. ''जान प्यारी असेल तर तुरंत शरण ये. नाहीतर बेमोत मारला जाशील.'' सक्त दमाची भाषा. महाराजांनी खलित्यास उत्तर पाठविले, अतिशय रसाळ भाषेत, ''तुम्ही तर आमच्या वडिलांच्या ठायी! आम्हाला तुमची फार भीती वाटते. तुम्हीच आम्हाला भेटायला या, म्हणजे आम्हाला जरा धीर येईल. राज्य आपलेच आहे.''
घोळून घोळून खानला आणला प्रतापगडावर. उभारला खानासाठी शामियाना. असा शामियाना की नक्षीदार, जडजवाहीर जडित, संपत्तीची लयलूट केलेला. इतका देखणा की बघावं आणि बघतच रहावं. असा शामियाना उभारायचं कारण म्हणजे खानाला संपत्तीची अशी लयलूट आवडते. ही सगळी संपत्ती बघून खान भुलतो.
घरात पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांच्या आधी हजर आपण. पण इथे उलटे आधी खान आला. शामियान्यात का... तर खान शामियान्यात आला आणि त्याला शिवाजी पहिला दिसला तर त्याच्या डोक्यात राग राहणारच. त्यामुळे आधी खान शामियान्यात आला आणि हरवून गेला. भुलून गेला खान त्या शामियान्याची शोभा बघून. मानसशास्त्र आहे हे महाराजांचे. खान येऊन टेकला आणि मग महाराजांनी गड सोडला. खानाचा शामियाना महाराजांना व्यवस्थित दिसत होता. पण महाराज वरतून येताना मात्र खानाला दिसू नये, म्हणून गड सोडण्याची वेळ सुद्धा भर दुपारची. आले महाराज. सोबत दहा अंगरक्षक.
शामियान्याच्या अलीकडे येवून राजे थांबले. आपल्या वकीलास शामियान्यात पाठविले व सय्यद बंडास बाहेर जाण्यास सांगितले. कारण सांगितले की, ''शिवाजी राजे डरते है सय्यद बंडा से'' खानाचे मानसिक खच्चीकरण राजांनी केले (आता शिवाजी तर आपल्या नोकरालाच घाबरतो मग आपणास तर...) चढला खान हरभ-याच्या झाडावर. जगाने या डावाला गनिमी कावा मानला, पण आपण ह्यास शिवसूत्र मानले.
राजे शामियान्यात आले बातचीत झाली आणि गळाभेटीसाठी राजे आणि खान पुढे सरसावले. जकडले राजांना आपल्या बाहुत. झाला दगा. मारला खानाने खंजीर राजांच्या पाठीत, सदरा फाटला. चिलखत असल्यामुळे राजांना इजा झाली नाही. पुढे राजांनी चाल केली. घातला बिचवा पोटात आणि पापणी लवायच्या आत काढला खानचा कोथळा बाहेर. खान कलंडला. सय्यद बंडा राजांवर चाल करून आला पण जीवा महालेने त्याचा अचूक वेध घेतला.
खान स्वतःला सावरत शामियान्याच्या बाहेर जाऊन त्याच्या पालखीत पडला. खानाच्या भोयांनी पालखी उचलून पळण्याची लगबग सुरु केली पण... खानाला तोडीस तोड अशा धिप्पाड अंगाचा, एकाच वेळी अर्ध बकरं जागीच बसवणारा, चार पाय धरून घोडा उचलणारा, चिखलात रुतलेली तोफ एकटाच काढणारा, असा संभाजी कावजी समोर ठाकला. ओढले त्याने वार भोयाच्या पायावर, पालखी पडली. पुढचा वार झाला तो खानच्या मानेवर आणि स्वराज्यावर चालून आलेल्या संकटास गर्दीस मिळवले.
"शिवबा...........
"तुम्ही काळजी करू नका. जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर आम्ही समजून जाऊ कि आम्ही आधीपासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्यामुळे तुमचा धीर खचून जाता कामा नये "
जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात.
महाराजांनी जावळी मारली आणि विजापूरची आदिलशाही पार थरारून गेली. सह्याद्रीचा हा वाघ आता डोईजड झाला होता. ह्याचा बंदोबस्त करणे म्हणजे काळाची गरज झाली होती. म्हणून बड्या बेगमने भर दरबारात आवाहन केले - ''कोण? कोण जाईल सह्याद्रीच्या त्या गुहेत? कोण पकडेल त्या वाघाला?'' सगळ्यांची जुबान बंद, डोळे जमिनीचे वेध घेत, मुंड्या खाली झुकल्या होत्या. बडी बेगम आग ओकत होती," ऐसा कोई माईका लाल नही, ऐसा एक भी मर्द नही इस बिजापुर दरबार में?" उत्तर काही येत नव्हते. पानाचे विडे जसे होते तसे तबकात निपचित पडले होते.
"हम जायेंगे बेगम साहिबा" कोण? कोण? कोण? सगळ्यांच्या माना मागे वळत होत्या. नक्की आवाज आला कुणाचा?
तो तोच ज्याने फर्जंद शहाजी राजांना कैद केले.
तो तोच ज्याने संभाजी राजांना दगा करून मारले.
तो तोच ज्याची औरंगजेबला पकडण्यापर्यंत मजल गेली.
आडवा तिडवा धिप्पाड अंगाचा, प्रचंड बुरुजासारखा, जसा राक्षसी देहाचा तसाच राक्षसी मनाचा.
... अफजल खान
उचलला विडा, आणि कोसळला महाराष्ट्रावर.
रक्ताचा सडा शिंपून उभे केलेले शिवार हा भस्मासूर पायदळी तुडवत निघाला, देव फोडले, मंदिरे नासवली, बाटवली. आता शिवाजी बाहेर पडेल असा त्याचा डाव. पण राजे लवकर बाहेर येईनात. इकडे खानाने रयत मारावयास सुरवात केली.
महाराजांनी राजगड सोडला व प्रतापगड जवळ केला. तो मृत्यूला घाबरून म्हणून नाही, तर राजगड ते प्रतापगड हा स्वराज्याचा बहुतांश भाग राजांनी अफझलखानपासून वाचवला. त्यात तो परिसर अतिभयाण. प्रतापगडाला जाण्यासाठी त्यावेळी एकच वाट होती. ती म्हणजे रणतोंडीची वाट. ज्या वाटेवरून जाताना तोंड रडल्याखेरीज राहत नाही अशी ती वाट.
खानाने घाईने वाई जवळ केली. खानाचे चाळीस हजाराचे सैन्य वाईच्या पसरणी घाटात पसरले. खानने राजांना खलिता पाठविला. ''जान प्यारी असेल तर तुरंत शरण ये. नाहीतर बेमोत मारला जाशील.'' सक्त दमाची भाषा. महाराजांनी खलित्यास उत्तर पाठविले, अतिशय रसाळ भाषेत, ''तुम्ही तर आमच्या वडिलांच्या ठायी! आम्हाला तुमची फार भीती वाटते. तुम्हीच आम्हाला भेटायला या, म्हणजे आम्हाला जरा धीर येईल. राज्य आपलेच आहे.''
घोळून घोळून खानला आणला प्रतापगडावर. उभारला खानासाठी शामियाना. असा शामियाना की नक्षीदार, जडजवाहीर जडित, संपत्तीची लयलूट केलेला. इतका देखणा की बघावं आणि बघतच रहावं. असा शामियाना उभारायचं कारण म्हणजे खानाला संपत्तीची अशी लयलूट आवडते. ही सगळी संपत्ती बघून खान भुलतो.
घरात पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांच्या आधी हजर आपण. पण इथे उलटे आधी खान आला. शामियान्यात का... तर खान शामियान्यात आला आणि त्याला शिवाजी पहिला दिसला तर त्याच्या डोक्यात राग राहणारच. त्यामुळे आधी खान शामियान्यात आला आणि हरवून गेला. भुलून गेला खान त्या शामियान्याची शोभा बघून. मानसशास्त्र आहे हे महाराजांचे. खान येऊन टेकला आणि मग महाराजांनी गड सोडला. खानाचा शामियाना महाराजांना व्यवस्थित दिसत होता. पण महाराज वरतून येताना मात्र खानाला दिसू नये, म्हणून गड सोडण्याची वेळ सुद्धा भर दुपारची. आले महाराज. सोबत दहा अंगरक्षक.
शामियान्याच्या अलीकडे येवून राजे थांबले. आपल्या वकीलास शामियान्यात पाठविले व सय्यद बंडास बाहेर जाण्यास सांगितले. कारण सांगितले की, ''शिवाजी राजे डरते है सय्यद बंडा से'' खानाचे मानसिक खच्चीकरण राजांनी केले (आता शिवाजी तर आपल्या नोकरालाच घाबरतो मग आपणास तर...) चढला खान हरभ-याच्या झाडावर. जगाने या डावाला गनिमी कावा मानला, पण आपण ह्यास शिवसूत्र मानले.
राजे शामियान्यात आले बातचीत झाली आणि गळाभेटीसाठी राजे आणि खान पुढे सरसावले. जकडले राजांना आपल्या बाहुत. झाला दगा. मारला खानाने खंजीर राजांच्या पाठीत, सदरा फाटला. चिलखत असल्यामुळे राजांना इजा झाली नाही. पुढे राजांनी चाल केली. घातला बिचवा पोटात आणि पापणी लवायच्या आत काढला खानचा कोथळा बाहेर. खान कलंडला. सय्यद बंडा राजांवर चाल करून आला पण जीवा महालेने त्याचा अचूक वेध घेतला.
खान स्वतःला सावरत शामियान्याच्या बाहेर जाऊन त्याच्या पालखीत पडला. खानाच्या भोयांनी पालखी उचलून पळण्याची लगबग सुरु केली पण... खानाला तोडीस तोड अशा धिप्पाड अंगाचा, एकाच वेळी अर्ध बकरं जागीच बसवणारा, चार पाय धरून घोडा उचलणारा, चिखलात रुतलेली तोफ एकटाच काढणारा, असा संभाजी कावजी समोर ठाकला. ओढले त्याने वार भोयाच्या पायावर, पालखी पडली. पुढचा वार झाला तो खानच्या मानेवर आणि स्वराज्यावर चालून आलेल्या संकटास गर्दीस मिळवले.
गनिमी कावा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा फौजेसाठी घालून दिलेली शिस्त !!
१. सरनौबाताने घोडदळ घेऊन वर्षातील आठ महिने मुलूखगिरीस जावे.
२. शत्रूच्या सधन मुलुखातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करावे.
३. स्वारीस जाताना प्रत्येक शिपायाच्या बिशादिची तपशीलवार यादी करून त्याची किंमत सरकारात नमूद करावी.
४. हीच यादी मोहिमेवरून परत आल्यावर पुन्हा तपासून पहावी .
५. या यादीव्यतिरिक्त त्या स्वाराकडे काही अधिक माल सापडल्यास तो लुटीचा समजून स्वराज्याच्या तिजोरीत जमा करावा किंवा तेवढी किंमत त्याच्या पगारातून बळती करावी.
६. स्वाराच्या जमा बिशादीपैकी एखादा जिन्नस गहाळ झाल्यास सरकारतून भरपाई करून द्यावी.
७.मोहिमेवर असताना शिलेदाराचा घोडा मेल्यास किंवा निरुपयोगी झाल्यावर सरकारातून ताबडतोब दुसरा घोडा दिला जावा .
८. स्वारीस जाणाऱ्या कोणाही शिपायाने आपली बायको बटीक किंवा कलावंतीन बरोबर नेऊ नये तसेच स्वारीबरोबर कलाल नसावे.
९. या नियमाचा भंग केल्यास देहांत शासन केले जाईल..
१०.शेतकऱ्यास आणि स्त्रियांस कदापि लुटू नये.
११. श्रीमंत लोकांकडून खंड वसूल करावा.नेक माणसांना त्रास देऊ नये.
१२. लुटीच्या वेळी स्त्रिया व मुले ह्यांना त्रास होता कामा नये.
१३. पावसाळा सुरु होऊन नद्यानाले भरण्याअगोदर लष्कराने स्वदेशी यावे.
१४. लुटीची एकंदर यादी करून तपासून राज्याच्या तिजोरीत जमा करावी.
१५. स्वारीत चांगले काम करण्यार्यांना नावाजले जाऊन बढती द्यावी.
१६. कोणी लढाईत मरण पावले तर त्यांच्या बायकामुलांना लष्करात नोकरी द्यावी.
१७. युद्धात कोणास कायम अपंगत्व आल्यास त्याला तह ह्यात वेतन सरकारतून मिळाव
१८. जखमी सैनिकास आजारी सैनिकास औषधोपचार सरकारातून व्हावा.
१९. बेकैद वर्तन करणाऱ्याला बडतर्फ केले जावे.
१. सरनौबाताने घोडदळ घेऊन वर्षातील आठ महिने मुलूखगिरीस जावे.
२. शत्रूच्या सधन मुलुखातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करावे.
३. स्वारीस जाताना प्रत्येक शिपायाच्या बिशादिची तपशीलवार यादी करून त्याची किंमत सरकारात नमूद करावी.
४. हीच यादी मोहिमेवरून परत आल्यावर पुन्हा तपासून पहावी .
५. या यादीव्यतिरिक्त त्या स्वाराकडे काही अधिक माल सापडल्यास तो लुटीचा समजून स्वराज्याच्या तिजोरीत जमा करावा किंवा तेवढी किंमत त्याच्या पगारातून बळती करावी.
६. स्वाराच्या जमा बिशादीपैकी एखादा जिन्नस गहाळ झाल्यास सरकारतून भरपाई करून द्यावी.
७.मोहिमेवर असताना शिलेदाराचा घोडा मेल्यास किंवा निरुपयोगी झाल्यावर सरकारातून ताबडतोब दुसरा घोडा दिला जावा .
८. स्वारीस जाणाऱ्या कोणाही शिपायाने आपली बायको बटीक किंवा कलावंतीन बरोबर नेऊ नये तसेच स्वारीबरोबर कलाल नसावे.
९. या नियमाचा भंग केल्यास देहांत शासन केले जाईल..
१०.शेतकऱ्यास आणि स्त्रियांस कदापि लुटू नये.
११. श्रीमंत लोकांकडून खंड वसूल करावा.नेक माणसांना त्रास देऊ नये.
१२. लुटीच्या वेळी स्त्रिया व मुले ह्यांना त्रास होता कामा नये.
१३. पावसाळा सुरु होऊन नद्यानाले भरण्याअगोदर लष्कराने स्वदेशी यावे.
१४. लुटीची एकंदर यादी करून तपासून राज्याच्या तिजोरीत जमा करावी.
१५. स्वारीत चांगले काम करण्यार्यांना नावाजले जाऊन बढती द्यावी.
१६. कोणी लढाईत मरण पावले तर त्यांच्या बायकामुलांना लष्करात नोकरी द्यावी.
१७. युद्धात कोणास कायम अपंगत्व आल्यास त्याला तह ह्यात वेतन सरकारतून मिळाव
१८. जखमी सैनिकास आजारी सैनिकास औषधोपचार सरकारातून व्हावा.
१९. बेकैद वर्तन करणाऱ्याला बडतर्फ केले जावे.
शिवरायांचे पत्रातील वर्णन-
"शिवाजीचे डोळे अतिशय तीक्ष्ण व विलक्षण तेजस्वी आहेत.त्याची बुद्धीमत्ता त्यातुन व्यक्त होते.तो दिवसातून एकच वेळ सामान्यतः भोजन करतो. तरीही त्याचे आरोग्य उत्कृष्ट आहे."
-जिन दि तेवनो
"शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून ,त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय ,असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण,स्पष्ट आणी तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते."
-कोस्मा दी गार्डा
"शिवाजीने उत्तरेस दमण आणी खाली गोवा ह्या आमच्या दोन्ही प्रदेशामधला सर्व मुलुख काबीज केला आहे. हिंदुस्थानच्या हा अँटिला(प्रख्यात हूण नेता) च्या चातुर्याची आणी पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. तो केवळ बचावाचेच खेळ खेळतो असे नव्हे तर चढाईचेही खेळतो."
-गोव्याचा व्हाईसराँयने पोर्तुगालच्या राजास लिहिलेळे पत्र २४ जानेवारी १६८०
(दुर्ग-खंड पहिला पुस्तकातुन)
-जिन दि तेवनो
"शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून ,त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय ,असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण,स्पष्ट आणी तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते."
-कोस्मा दी गार्डा
"शिवाजीने उत्तरेस दमण आणी खाली गोवा ह्या आमच्या दोन्ही प्रदेशामधला सर्व मुलुख काबीज केला आहे. हिंदुस्थानच्या हा अँटिला(प्रख्यात हूण नेता) च्या चातुर्याची आणी पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. तो केवळ बचावाचेच खेळ खेळतो असे नव्हे तर चढाईचेही खेळतो."
-गोव्याचा व्हाईसराँयने पोर्तुगालच्या राजास लिहिलेळे पत्र २४ जानेवारी १६८०
(दुर्ग-खंड पहिला पुस्तकातुन)
आयुष्याची ३६ वर्ष ह्या महाराष्ट्रात घालवली स्वराज्य संपवायला. स्वराज्यच का???
औरंगजेबाचा वार्षिक महसुल त्या काळा मध्ये ३५० कोटी आहे आणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महसूल कसाबसा एक कोटी आहे. औरंगजेबाच्या फक्त सरदारांची संख्या साडे १४ हजार आहे आणी एका सरदाराच्या हाताखालीकमीत कमी ४०००० च सैन्य आहे. तर शिवाजी महाराजांच सैन्य कसंबसं फक्त ३५००० आहे.
मग हा एवढ्या बलाढ्य औरंगजेब स्वराज्याला का चिरडायला निघाला.हयात घालवली त्यानी. आयुष्याची ३६ वर्ष ह्या महाराष्ट्रात घालवली स्वराज्य संपवायला. स्वराज्यच का???
तिकडं अफगानिस्थान तसाच आहे.
इरान तसंच आहे.
गोवळकोंड्याची कुतूबशाही तशीच आहे.
नगरची निजामशाही तशीच आहे.
विजापुरची आदिलशाही तशीच आहे.
ते घे ना. विजापुर ची आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, अफगानिस्थान घे. महाराषट्रच का ???
स्वराज्यच का ?
याचं उत्तर त्याच्या इतिहासकारांनी लिहुन ठेवलं आहे.
औरंगजेबने स्वत: लिहुन ठेवलेल आहे असं म्हणतात.
तो लिहितो
'इरानच राज्य शाहबाजच आहे.
अफगानिस्थानच राज्य मिरकुत्कुल आहे.
विजापुरचं राज्च आदिलशहाचां आहे.
गोवळकोंड्याच राज्य कुतुबशाहाच आहे.
नगरच राज्या निजामशाहाच आहे.
पण शिवाजींच स्वराज्य हे कोणत्य राजा, सुलतान, सम्राट, बादशहाच नसुन हे लोकांच म्हणजे रयतेचं राज्य आहे.
आणी जिथ रयतेच राज्य असतं तिथे माणसं मरायला आणी मारायला मागे पुढे बघत नाही. आणी सगळ्यात मोठा धोका आहे तो हा.'
औरंगजेबानी जणु स्वराज्याच्या यशसवितेच गणित मांडल.
हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचे तख्त ही वाचणार नाही हे औरंगजेबाला कळुन चुकलं होतं.
आणी हे खरंच आहे. तो बुंदेलखंडाचाछत् रसाल बुंदेला औरंगजेबाची नौकरी सोडुन महाराजांकडे आला आणीम्हणाला की त्याला महाराजांच्या सौन्यात सामील व्हायचए. महाराजांनी नकार दिला आणी त्यालासमजवलं की जसं त्यांनी इथे स्वराज्य स्थापन केलं तसं त्यानेबुंदेलखंड ात करावं. आणी तो छत्रसाल बुंदेला महाराजांकडुन प्रेरना घेऊन गेला आणी त्याने बुंदेलखंड स्वतंत्र केलं. हे बघुन औरंगजेबाला कळाल होतं की सगळ्यात मोठा धोका म्हणजे हा स्वाराज्याचा प्रयोग.
आजही मध्य प्रदेश मध्ये बुंदेलखंडात छत्रसाल बुंदेलाची देवा सारखी पूजा करतात. ज्या माणसाला महाराजांनी घडवलं त्याची देवा सारखी पूजा करतात मध्य प्रदेश मधे. आणी आपलं हे दुर्दैवं की आपण आज पण महाराजांच नाव घेऊन जात, धर्म, तारीख, तिथी यावर भांडतो...
जगदवंदनीय विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!
औरंगजेबाचा वार्षिक महसुल त्या काळा मध्ये ३५० कोटी आहे आणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महसूल कसाबसा एक कोटी आहे. औरंगजेबाच्या फक्त सरदारांची संख्या साडे १४ हजार आहे आणी एका सरदाराच्या हाताखालीकमीत कमी ४०००० च सैन्य आहे. तर शिवाजी महाराजांच सैन्य कसंबसं फक्त ३५००० आहे.
मग हा एवढ्या बलाढ्य औरंगजेब स्वराज्याला का चिरडायला निघाला.हयात घालवली त्यानी. आयुष्याची ३६ वर्ष ह्या महाराष्ट्रात घालवली स्वराज्य संपवायला. स्वराज्यच का???
तिकडं अफगानिस्थान तसाच आहे.
इरान तसंच आहे.
गोवळकोंड्याची कुतूबशाही तशीच आहे.
नगरची निजामशाही तशीच आहे.
विजापुरची आदिलशाही तशीच आहे.
ते घे ना. विजापुर ची आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, अफगानिस्थान घे. महाराषट्रच का ???
स्वराज्यच का ?
याचं उत्तर त्याच्या इतिहासकारांनी लिहुन ठेवलं आहे.
औरंगजेबने स्वत: लिहुन ठेवलेल आहे असं म्हणतात.
तो लिहितो
'इरानच राज्य शाहबाजच आहे.
अफगानिस्थानच राज्य मिरकुत्कुल आहे.
विजापुरचं राज्च आदिलशहाचां आहे.
गोवळकोंड्याच राज्य कुतुबशाहाच आहे.
नगरच राज्या निजामशाहाच आहे.
पण शिवाजींच स्वराज्य हे कोणत्य राजा, सुलतान, सम्राट, बादशहाच नसुन हे लोकांच म्हणजे रयतेचं राज्य आहे.
आणी जिथ रयतेच राज्य असतं तिथे माणसं मरायला आणी मारायला मागे पुढे बघत नाही. आणी सगळ्यात मोठा धोका आहे तो हा.'
औरंगजेबानी जणु स्वराज्याच्या यशसवितेच गणित मांडल.
हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचे तख्त ही वाचणार नाही हे औरंगजेबाला कळुन चुकलं होतं.
आणी हे खरंच आहे. तो बुंदेलखंडाचाछत् रसाल बुंदेला औरंगजेबाची नौकरी सोडुन महाराजांकडे आला आणीम्हणाला की त्याला महाराजांच्या सौन्यात सामील व्हायचए. महाराजांनी नकार दिला आणी त्यालासमजवलं की जसं त्यांनी इथे स्वराज्य स्थापन केलं तसं त्यानेबुंदेलखंड ात करावं. आणी तो छत्रसाल बुंदेला महाराजांकडुन प्रेरना घेऊन गेला आणी त्याने बुंदेलखंड स्वतंत्र केलं. हे बघुन औरंगजेबाला कळाल होतं की सगळ्यात मोठा धोका म्हणजे हा स्वाराज्याचा प्रयोग.
आजही मध्य प्रदेश मध्ये बुंदेलखंडात छत्रसाल बुंदेलाची देवा सारखी पूजा करतात. ज्या माणसाला महाराजांनी घडवलं त्याची देवा सारखी पूजा करतात मध्य प्रदेश मधे. आणी आपलं हे दुर्दैवं की आपण आज पण महाराजांच नाव घेऊन जात, धर्म, तारीख, तिथी यावर भांडतो...
जगदवंदनीय विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!
शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे
शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. हे वाघनख उत्कृष्ट पोलादी आहे. हे लंडनला कोणी दिले ? त्याचा वेध आणि शोध घेतला , तर थोडा सुगावा लागतो. ग्रँड डफ हा इ. १८१८ ते २४ पर्यंत सातारा येथे इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमलेला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या आणि इस्ट इंडिया कंपनीच्या संबंधातले राजकीय व्यवहार तो पाहत असे. तो हुशार होता. तो प्रथम हित पाहत असे , ते आपल्या इंग्लंड देशाचे आणि इस्ट इंडिया कंपनीचे. त्याला इतिहासाचीही आवड होती. साताऱ्यातील वास्तव्यात मराठ्यांच्या इतिहासावर आणि त्यातल्यात्यात शिवकालावर लिहिण्याची त्याने आकांक्षा धरली आणिती पूर्ण केली. त्याने लिहिलेला'हिस्टरी ऑफ मराठाज'हा गंथ म्हणजे मराठी इतिहासावर लिहिला गेलेला , कालक्रमानुसार असलेला पहिलाच गंथ आहे. म्हणून त्याला मराठी इतिहासाचा पहिला इतिहासग्रंथ लेखक हा मान दिला जातो. तो अत्यंत सावध लेखक आहे. त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांशी मैत्रीचे संबंध ठेवून आपले काम सुविधेने साधले. त्याने बहुदा याच काळात शिवाजीमहाराजांच ी वाघनखे
प्रतापसिंह महाराजांकडून भेट म्हणून मिळवली असावीत. ही वाघनखे त्याने इंग्लंडला जाताना बरोबर नेली. ती त्याच्या वंशजांकडेच होती. चार धारदार नखे असलेले हे पोलादी हत्यार अतिशय प्रमाणबद्ध आणि सुबक आहे. हे हत्यार डाव्या हाताच्या बोटात घालून वापरावयाचे आहे. ग्रँड डफच्या आजच्या वंशजाने (बहुदा तो ग्रँड डफचा पणतू किंवा खापरपणतू असावा) व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे हत्यार दान केले. अफझलखानच्या भेटीच्या वेळी महाराजांनी जे वाघनख नेलेहोते , तेच हे हत्यार. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वस्तूसूचीमध्ये ही माहिती अगदी त्रोटक अशी सूचित केली आहे.
महाराजांची जी समकालीन चित्रे (पेन्टिंग्ज) समकालीन चित्रकारांनी काढलेली म्हणून आज उपलब्धआहेत , त्यातील काही चित्रांत महाराजांचे हातांत पट्टापान तलवार म्हणजेच सरळ पात्याची तलवार म्यानासह दाखविलेली दिसते. तसेच पोलादी पट्टा हातात घेतलेलाही दिसतो. तसेच कमरेला कट्यार (म्हणजे पेश कब्ज) खोवलेलीही दिसते. पण महाराजांचा हा पोलादी पट्टा आणि कट्यार आज उपलब्ध नाही. तसेच त्यांची ढाल आणि हातावरचे संरक्षक दस्ते (म्हणजे मनगटापासून कोपरापर्यंत दोन्ही हातांचे संरक्षण करणारे , दोन्ही हातांची धातूंची वेष्टणे) आज उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे महाराजांचे पोलादी चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण आणि कापडी चिलखत आणि कापडी शिरस्त्राण होते. पण आज त्यातील काहीही उपलब्ध नाही.
याशिवाय त्यांच्या खास शिलेखान्यात (शस्त्रगारात) आणखीही काही हत्यारे असतीलच. त्यात भाला , विटे , धनुष्यबाण , खंजीर इत्यादी हत्यारे असणारच. अफझलखानाचे भेटीचे वेळी त्यांनी प्रत्यक्ष वापरलेला बिचवा होता. परंतु आता यातील काहीही उपलब्ध नाही. बंदुका , तमंचे (म्हणजे ठासणीची पिस्तुले) , कडाबिना (म्हणजे नरसावयासारखे तोंड असलेले मोठे पिस्तुलयात दारूबरोबरच अनेक गोळ्या ठासून ते उडवीत असत. त्या काळची जणू ही अनेक गोळ्या उडविणारी मशिनगनच) अशी विविध प्रकारची हत्यारे राजशास्त्रालयात नक्कीच असणार. पण महाराजांच्या राजशास्त्रालयाच ा आज कोणताही भाग उपलब्ध नाही. धातूच्या हत्यारांना'गोडे हत्यार'असे म्हणत. अन् दारू ठासून वापरण्यासहत्यार ांना'उडते हत्यार'असे म्हणत. एकूण शिवस्पशिर्त हत्यारांबाबत सध्या एवढेच सांगता येते.
Amit Kamble
प्रतापसिंह महाराजांकडून भेट म्हणून मिळवली असावीत. ही वाघनखे त्याने इंग्लंडला जाताना बरोबर नेली. ती त्याच्या वंशजांकडेच होती. चार धारदार नखे असलेले हे पोलादी हत्यार अतिशय प्रमाणबद्ध आणि सुबक आहे. हे हत्यार डाव्या हाताच्या बोटात घालून वापरावयाचे आहे. ग्रँड डफच्या आजच्या वंशजाने (बहुदा तो ग्रँड डफचा पणतू किंवा खापरपणतू असावा) व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे हत्यार दान केले. अफझलखानच्या भेटीच्या वेळी महाराजांनी जे वाघनख नेलेहोते , तेच हे हत्यार. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वस्तूसूचीमध्ये ही माहिती अगदी त्रोटक अशी सूचित केली आहे.
महाराजांची जी समकालीन चित्रे (पेन्टिंग्ज) समकालीन चित्रकारांनी काढलेली म्हणून आज उपलब्धआहेत , त्यातील काही चित्रांत महाराजांचे हातांत पट्टापान तलवार म्हणजेच सरळ पात्याची तलवार म्यानासह दाखविलेली दिसते. तसेच पोलादी पट्टा हातात घेतलेलाही दिसतो. तसेच कमरेला कट्यार (म्हणजे पेश कब्ज) खोवलेलीही दिसते. पण महाराजांचा हा पोलादी पट्टा आणि कट्यार आज उपलब्ध नाही. तसेच त्यांची ढाल आणि हातावरचे संरक्षक दस्ते (म्हणजे मनगटापासून कोपरापर्यंत दोन्ही हातांचे संरक्षण करणारे , दोन्ही हातांची धातूंची वेष्टणे) आज उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे महाराजांचे पोलादी चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण आणि कापडी चिलखत आणि कापडी शिरस्त्राण होते. पण आज त्यातील काहीही उपलब्ध नाही.
याशिवाय त्यांच्या खास शिलेखान्यात (शस्त्रगारात) आणखीही काही हत्यारे असतीलच. त्यात भाला , विटे , धनुष्यबाण , खंजीर इत्यादी हत्यारे असणारच. अफझलखानाचे भेटीचे वेळी त्यांनी प्रत्यक्ष वापरलेला बिचवा होता. परंतु आता यातील काहीही उपलब्ध नाही. बंदुका , तमंचे (म्हणजे ठासणीची पिस्तुले) , कडाबिना (म्हणजे नरसावयासारखे तोंड असलेले मोठे पिस्तुलयात दारूबरोबरच अनेक गोळ्या ठासून ते उडवीत असत. त्या काळची जणू ही अनेक गोळ्या उडविणारी मशिनगनच) अशी विविध प्रकारची हत्यारे राजशास्त्रालयात नक्कीच असणार. पण महाराजांच्या राजशास्त्रालयाच ा आज कोणताही भाग उपलब्ध नाही. धातूच्या हत्यारांना'गोडे हत्यार'असे म्हणत. अन् दारू ठासून वापरण्यासहत्यार ांना'उडते हत्यार'असे म्हणत. एकूण शिवस्पशिर्त हत्यारांबाबत सध्या एवढेच सांगता येते.
Amit Kamble
सेक्युलर म्हणजे नक्की काय ???
याच उत्तर देताना बरेचदा शिवरायांचं उदाहरण देण्यात येतं आणि वर इतर धर्मांचा आंधळेपणाने अतिरेकी आदर करताना आपला धर्म कसा वाईट याच्या गोष्टी रंगवून सांगण्यात येतात.
अशा लोकांनी आधी शिवरायांचा धर्मभाव आणि त्यांनी इतर धर्मांना दिलेला आदर कसा होता हे अभ्यासावे.
दुसर्या धर्माचा आदर करण्यासाठी स्वतःचा धर्माचा अपमान करणारे शिवरायांचा वारसा सांगूच शकत नाहीत.
शिवरायांनी इतर धर्मांचा योग्य तितका आदर केला पण स्वधर्माभिमान त्यांच्या ठाई ठासून भरलेला होता.
इतर धर्मांचा आदर करा पण आपल्या धर्मावरकोणी धर्माच्या नावाखाली अन्याय करत असेल तर बेगडी आदर सोडून धर्म कसा जपावा हे शिवरायांनी बर्याचदा दाखवून दिलेले आहे.
'रणजीत देसाई' यांच्या 'श्रीमान योगी' या ऐतिहासिक कादंबरीत याचे खूप छान उदाहरण सापडते. ते इथे फक्त संदर्भ म्हणून ते देत आहे कोणाचेही या पुस्तकातील हितसंबंध डावलण्याचा हेयू नाही....
राजांची छावणी तिरुवन्नमलईला पडली होती... सकाळची वेळ होती. राजे हंबीरराव, जनार्दनपंत यांच्यासह छावणीची पाहणी करत होते......
राजे म्हणाले,
'गाव किती सुरेख आहे !'
'एके काळी हे गाव हिंदूंचे तीर्थक्षेत्र होते.' जनार्दनपंतांनी सांगितले.
'एके काळी ?'
' हो. येथे श्रीशिव आणि समेत्तिपेरुमल दैवतांची सुरेख मंदिरे होती.'
'मग त्याचं काय झालं ?'
'विजयनगर-साम्राज्याच्या विध्वंसाबरोबर ती मंदिरे मुसलमानी आक्रमणाखाली पाडली गेली.'
'अरेरे ! आता त्या ठिकाणी काहीही नाही ?' राजांनी विचारले.
'त्या पुरातन मंदिरांच्या जागेवर मुसामानांनी मशिदी बांधल्या आहेत.' .....
राजांची पावले थांबली. एका खड्यात काळभोर नंदी उखळून विरुपावस्थेत पडला होता. त्याच्या पासून थोड्याच अंतरावर सुंदर पाषाणात कोरलेले भ्रष्ट शिवलिंग आजूबाजूच्या हिरवळीतून डोकावत होते. ते उजाड, विषण्ण अवशेष पाहून राजांचे मन उद्विग्न झाले. ते उद्गारले,
'माणसं जगतात तरी कशी ?'
'सत्ताधार्यांच्या आक्रमणापुढे नेहेमीच मान तुकवली जाते.'
'पंत, वतनाच्या हक्कासाठी पिढ्या-न्-पिढ्या झगडणारी माणसे. ही आमची वतने भंगली, तरी उघड्या डोळ्यांनी आम्ही ते पाहतो. आमची दैवते भग्न होतात, आणि ती आम्ही पाहतो.'
राजे समेत्तिपेरुमलच्या मंदिराचे मशिदीत झालेले रुपांतर पाहत होते. राजे ते पाहून सुन्न झाले. 'धर्माच्या नावावर केवढ अधर्मी कृत्य हे !' ज्या मंदिराच्या उभारणीसाठी शेकडो कलावंतांनी,शिल्पकारांनी अहोरात्र मेहनत घेतली असेल, ती माणसाच्या दृष्टीला सुखावणारी, थक्क करणारी, परमेश्वराचा साक्षात्कार घडवणारी ही आमची मंदिरे परक्या धर्मप्रचारासाठी नेस्तनाबूत केली जातात. एवढच नव्हे, तर त्याच पवित्र वास्तूवर मशिदी बांधल्या जातात. पंत ही हिम्मत आली कोठून ?'
'महाराज !' रघुनाथपंतांचा आवाज विषण्ण झाला होता.
' त्याच एकच कारण आहे ! मुसलमानांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. त्या धर्मनिष्ठेपायी सर्वस्वाचे बलिदान करण्याची तयारी आहे. हे फिरंगी आपल्या धर्मासाठी सतसमुद्र ओलांडतात. परमुलखात धर्मप्रचार करतात. केवढी त्यांची निष्ठा ! तीच निष्ठा त्यांना विजयी बनविते. आणि आम्ही हिंदू म्हणवून घेतो, पण उघड्या डोळ्यांनी आपल्या धर्माचा ऱ्हास पाहतो. ज्यांना स्वधर्म निष्ठा नाही, त्यांचा भाग्योदय कसा होणार ?'
'पण महाराज, झाल्या गोष्टीपुढे इलाज काय ? आपण काय करू शकतो ?'
राजांची संतप्त नजर हंबीररावांवर खिळली.
'हंबीरराव, हे तुम्ही बोलता ? आमचे सेनापती हे बोलतात ? मग छत्रपती कशासाठी झालो ? लूट करणे, मुलुख जाळणे, स्वराज्याचा विस्तार करणे याचसाठी का आमचं राज्य ?' राजांचा चेहेरा करारी बनला. एक वेगळेच तेज त्यांच्या चेहेर्यावर प्रकटले होते. राजांनी निश्चयपूर्वक आज्ञा दिली.
'पंत, या मशिदी पडून टाका. येथे आमच्या दैवतांची पुन्हा स्थापना करा. समेत्तिपेरूमलच्या मंदिराच्या पडलेल्या ह्या विटांतून नायक राजांनी बांधलेल्या या हजारखांबी मंडवासमोर सुरेख गोपूर बांधा. या दैवतांची पुन्हा प्रतिष्ठापना झाल्याखेरीज आमच्या मनाला शांती लाभणार नाही.'
या आज्ञेने जनार्दनपंत, हंबीरराव चकित झाले. जनार्दनपंत म्हणाले, 'पण महाराज, या मशिदी पाडल्या तर मुसलमानांची मने दुखावतील.'
'आमची मंदिरे पाडली आणि मशिदी उभ्या केल्या, तेव्हा आमच्या भावना दुखावतील, याचा कुणी विचार केला होता ? किंबहुना, आमचा धर्म नष्ट करण्यासाठीच ही कृत्ये केली ना ?'
'एका धर्मवेड्या पिढीने हे केलं, म्हणून आजच्या पिढीवर हा अन्याय......'
'पंत परधर्मसहिष्णुता म्हणजे स्वधर्माबद्दल अनास्था नव्हे. याच विचारांमुळे परकीय आक्रमण सहन करण्याची सवय आम्हाला लागली आहे. मनं कोडगी बनलीत. देवळी फोडली, तरी आम्ही स्वस्थ ! विजयनगरचं साम्राज्य कोलमडलं, तरी खंत नाही ! आमच्या आयाबहिणींची अब्रू लुटली गेली, तरी आनंद ! माणूस म्हणून जगायचं तरी कशाला ? कशासाठी ? हीच सवय नडली आम्हाला. नाहीतर आम्हा करोडो हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारं काशीविश्वेश्वराचं मंदिर औरंगजेब पडू धजला नसता. पंत, धर्म हा एका पिढीचा खेळ नाही. तो पिढ्या-न्-पिढ्यांचा वारसा आहे. तो टिकवणे हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला परधर्माचा द्वेष नाही. आमच्या फौजेत मुसलमान आहेत. त्यांच्या मशिदी बांधायला विशाल भूमी मोकळी आहे. त्या आमच्याच पवित्र जागेवर बांधल्या गेल्या पाहिजेत, असं कोणी म्हणेल, तर ते आमच्या राज्यात होणार नाही. आमच्या हुकुमाची अंमलबजावणी ताबडतोब करा.'
राजांच्या आज्ञेने मशिदी पाडण्यात आल्या. मंदिराचे काम सुरू झाले.......
हा कादंबरीतील उल्लेख म्हणजे परिकल्पना नव्हे तर खराखुरा इतिहास आहे आणि समेत्तिपेरूमलचं मंदिर हे त्याला साक्ष आहे. सेक्युलर म्हणवून घेणार्यांनी या गोष्टीचा आधी विचार करायला हवा की धर्मनिरपेक्षता ही दोन्ही बाजूने असेल तर ती निरपेक्षता असते नाहीतर समोरच्यासाठी अपेक्षा पूर्ण करण्याचे ते शस्त्र ठरते. असे शस्त्र जे आपण स्वतःहून त्यांना पुरवतो आणि सांगतो काप माझा गळा.
इतर धर्मांचा आदर मी सुद्धा करते पण त्याही पेक्षा माझा धर्म मला प्रिय आहे. दुसर्याच्या आईचा आदर करता येतो पण प्रेम आपल्याच आईवर रहात.
- रुपाली राणेजय
भवानी.... जय शिवाजी....
याच उत्तर देताना बरेचदा शिवरायांचं उदाहरण देण्यात येतं आणि वर इतर धर्मांचा आंधळेपणाने अतिरेकी आदर करताना आपला धर्म कसा वाईट याच्या गोष्टी रंगवून सांगण्यात येतात.
अशा लोकांनी आधी शिवरायांचा धर्मभाव आणि त्यांनी इतर धर्मांना दिलेला आदर कसा होता हे अभ्यासावे.
दुसर्या धर्माचा आदर करण्यासाठी स्वतःचा धर्माचा अपमान करणारे शिवरायांचा वारसा सांगूच शकत नाहीत.
शिवरायांनी इतर धर्मांचा योग्य तितका आदर केला पण स्वधर्माभिमान त्यांच्या ठाई ठासून भरलेला होता.
इतर धर्मांचा आदर करा पण आपल्या धर्मावरकोणी धर्माच्या नावाखाली अन्याय करत असेल तर बेगडी आदर सोडून धर्म कसा जपावा हे शिवरायांनी बर्याचदा दाखवून दिलेले आहे.
'रणजीत देसाई' यांच्या 'श्रीमान योगी' या ऐतिहासिक कादंबरीत याचे खूप छान उदाहरण सापडते. ते इथे फक्त संदर्भ म्हणून ते देत आहे कोणाचेही या पुस्तकातील हितसंबंध डावलण्याचा हेयू नाही....
राजांची छावणी तिरुवन्नमलईला पडली होती... सकाळची वेळ होती. राजे हंबीरराव, जनार्दनपंत यांच्यासह छावणीची पाहणी करत होते......
राजे म्हणाले,
'गाव किती सुरेख आहे !'
'एके काळी हे गाव हिंदूंचे तीर्थक्षेत्र होते.' जनार्दनपंतांनी सांगितले.
'एके काळी ?'
' हो. येथे श्रीशिव आणि समेत्तिपेरुमल दैवतांची सुरेख मंदिरे होती.'
'मग त्याचं काय झालं ?'
'विजयनगर-साम्राज्याच्या विध्वंसाबरोबर ती मंदिरे मुसलमानी आक्रमणाखाली पाडली गेली.'
'अरेरे ! आता त्या ठिकाणी काहीही नाही ?' राजांनी विचारले.
'त्या पुरातन मंदिरांच्या जागेवर मुसामानांनी मशिदी बांधल्या आहेत.' .....
राजांची पावले थांबली. एका खड्यात काळभोर नंदी उखळून विरुपावस्थेत पडला होता. त्याच्या पासून थोड्याच अंतरावर सुंदर पाषाणात कोरलेले भ्रष्ट शिवलिंग आजूबाजूच्या हिरवळीतून डोकावत होते. ते उजाड, विषण्ण अवशेष पाहून राजांचे मन उद्विग्न झाले. ते उद्गारले,
'माणसं जगतात तरी कशी ?'
'सत्ताधार्यांच्या आक्रमणापुढे नेहेमीच मान तुकवली जाते.'
'पंत, वतनाच्या हक्कासाठी पिढ्या-न्-पिढ्या झगडणारी माणसे. ही आमची वतने भंगली, तरी उघड्या डोळ्यांनी आम्ही ते पाहतो. आमची दैवते भग्न होतात, आणि ती आम्ही पाहतो.'
राजे समेत्तिपेरुमलच्या मंदिराचे मशिदीत झालेले रुपांतर पाहत होते. राजे ते पाहून सुन्न झाले. 'धर्माच्या नावावर केवढ अधर्मी कृत्य हे !' ज्या मंदिराच्या उभारणीसाठी शेकडो कलावंतांनी,शिल्पकारांनी अहोरात्र मेहनत घेतली असेल, ती माणसाच्या दृष्टीला सुखावणारी, थक्क करणारी, परमेश्वराचा साक्षात्कार घडवणारी ही आमची मंदिरे परक्या धर्मप्रचारासाठी नेस्तनाबूत केली जातात. एवढच नव्हे, तर त्याच पवित्र वास्तूवर मशिदी बांधल्या जातात. पंत ही हिम्मत आली कोठून ?'
'महाराज !' रघुनाथपंतांचा आवाज विषण्ण झाला होता.
' त्याच एकच कारण आहे ! मुसलमानांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. त्या धर्मनिष्ठेपायी सर्वस्वाचे बलिदान करण्याची तयारी आहे. हे फिरंगी आपल्या धर्मासाठी सतसमुद्र ओलांडतात. परमुलखात धर्मप्रचार करतात. केवढी त्यांची निष्ठा ! तीच निष्ठा त्यांना विजयी बनविते. आणि आम्ही हिंदू म्हणवून घेतो, पण उघड्या डोळ्यांनी आपल्या धर्माचा ऱ्हास पाहतो. ज्यांना स्वधर्म निष्ठा नाही, त्यांचा भाग्योदय कसा होणार ?'
'पण महाराज, झाल्या गोष्टीपुढे इलाज काय ? आपण काय करू शकतो ?'
राजांची संतप्त नजर हंबीररावांवर खिळली.
'हंबीरराव, हे तुम्ही बोलता ? आमचे सेनापती हे बोलतात ? मग छत्रपती कशासाठी झालो ? लूट करणे, मुलुख जाळणे, स्वराज्याचा विस्तार करणे याचसाठी का आमचं राज्य ?' राजांचा चेहेरा करारी बनला. एक वेगळेच तेज त्यांच्या चेहेर्यावर प्रकटले होते. राजांनी निश्चयपूर्वक आज्ञा दिली.
'पंत, या मशिदी पडून टाका. येथे आमच्या दैवतांची पुन्हा स्थापना करा. समेत्तिपेरूमलच्या मंदिराच्या पडलेल्या ह्या विटांतून नायक राजांनी बांधलेल्या या हजारखांबी मंडवासमोर सुरेख गोपूर बांधा. या दैवतांची पुन्हा प्रतिष्ठापना झाल्याखेरीज आमच्या मनाला शांती लाभणार नाही.'
या आज्ञेने जनार्दनपंत, हंबीरराव चकित झाले. जनार्दनपंत म्हणाले, 'पण महाराज, या मशिदी पाडल्या तर मुसलमानांची मने दुखावतील.'
'आमची मंदिरे पाडली आणि मशिदी उभ्या केल्या, तेव्हा आमच्या भावना दुखावतील, याचा कुणी विचार केला होता ? किंबहुना, आमचा धर्म नष्ट करण्यासाठीच ही कृत्ये केली ना ?'
'एका धर्मवेड्या पिढीने हे केलं, म्हणून आजच्या पिढीवर हा अन्याय......'
'पंत परधर्मसहिष्णुता म्हणजे स्वधर्माबद्दल अनास्था नव्हे. याच विचारांमुळे परकीय आक्रमण सहन करण्याची सवय आम्हाला लागली आहे. मनं कोडगी बनलीत. देवळी फोडली, तरी आम्ही स्वस्थ ! विजयनगरचं साम्राज्य कोलमडलं, तरी खंत नाही ! आमच्या आयाबहिणींची अब्रू लुटली गेली, तरी आनंद ! माणूस म्हणून जगायचं तरी कशाला ? कशासाठी ? हीच सवय नडली आम्हाला. नाहीतर आम्हा करोडो हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारं काशीविश्वेश्वराचं मंदिर औरंगजेब पडू धजला नसता. पंत, धर्म हा एका पिढीचा खेळ नाही. तो पिढ्या-न्-पिढ्यांचा वारसा आहे. तो टिकवणे हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला परधर्माचा द्वेष नाही. आमच्या फौजेत मुसलमान आहेत. त्यांच्या मशिदी बांधायला विशाल भूमी मोकळी आहे. त्या आमच्याच पवित्र जागेवर बांधल्या गेल्या पाहिजेत, असं कोणी म्हणेल, तर ते आमच्या राज्यात होणार नाही. आमच्या हुकुमाची अंमलबजावणी ताबडतोब करा.'
राजांच्या आज्ञेने मशिदी पाडण्यात आल्या. मंदिराचे काम सुरू झाले.......
हा कादंबरीतील उल्लेख म्हणजे परिकल्पना नव्हे तर खराखुरा इतिहास आहे आणि समेत्तिपेरूमलचं मंदिर हे त्याला साक्ष आहे. सेक्युलर म्हणवून घेणार्यांनी या गोष्टीचा आधी विचार करायला हवा की धर्मनिरपेक्षता ही दोन्ही बाजूने असेल तर ती निरपेक्षता असते नाहीतर समोरच्यासाठी अपेक्षा पूर्ण करण्याचे ते शस्त्र ठरते. असे शस्त्र जे आपण स्वतःहून त्यांना पुरवतो आणि सांगतो काप माझा गळा.
इतर धर्मांचा आदर मी सुद्धा करते पण त्याही पेक्षा माझा धर्म मला प्रिय आहे. दुसर्याच्या आईचा आदर करता येतो पण प्रेम आपल्याच आईवर रहात.
- रुपाली राणेजय
भवानी.... जय शिवाजी....
शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘लंडन गॅझेट’ वृत्तपत्रामध्ये
इतिहासातील महत्त्वाची घटना असणाऱ्या सूरत लुटीची बातमी ब्रिटनच्या ‘लंडन गॅझेट’ या वृत्तपत्रातून इ.स. १६७२ मध्ये छापून आली असल्याची माहिती इतिहासाच्या अभ्यासक सायली पाळंदे-दातार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महाराजांचा इंग्रजी वृत्तपत्रात प्रथमच उल्लेख सापडला असल्याचे त्यांनी सांगितले.
इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पुस्तकातील संदर्भात ‘न्यूज बुक’ असा उल्लेख असल्याने त्या काळच्या इतर घडामोडींची नोंद वृत्तपत्रांतून असणार या विचाराने पाळंदे-दातार यांनी या विषयावर संशोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या शिफारस पत्राच्या मदतीने लंडन येथील ब्रिटीश लायब्ररीत उपलब्ध असणाऱ्या संदर्भांचा अभ्यास केला. लंडन गॅझेटच्या रविवार, १७ फेब्रुवारी ते गुरुवार २० फेब्रुवारी १६७२ च्या अंकात सूरत लुटीची बातमी पहिल्या पानावर छापली आहे. लंडनमध्ये त्याकाळी निरनिराळ्या प्रकारची सात-आठ वृत्तपत्रे अस्तित्त्वात होती. त्यापैकी लंडन गॅझेट हे वृत्तपत्र सरकारतफेर् प्रसिद्ध होत असे. यात साधारण बातम्या प्रसिद्ध होत नसत. जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींची दखल वृत्तपत्रातून घेतली जात असे. बातम्यांचे मुख्य स्त्रोत सरकारी दस्ताऐवज, पत्रे असल्याचे पाळंदे-दातार यांनी सांगितले.
सूरत लुटीची बातमी म्हणजे सूरतचे गव्हर्नर अलेपो यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेले पत्र आहे. यात महाराजांचा ’sevagee the rebel’ असा आक्षेपार्ह उल्लेख केला आहे. संपूर्ण देशावर नियंत्रण असलेल्या मुघल साम्राज्याला अनेक लढायांमध्ये हरवले असून आम्हालाही याची भिती वाटते, असे अलेपो यांनी या पत्रात म्हटले आहे. ब्रिटीशांसाठी मुंबई हे ठिकाण सुरक्षित असून यावर ताबा मिळवून येेथे व्यवसायासाठी बंदर उभे करावे, अशी सूचना या पत्रात करण्यात आली असल्याचे पाळंदे-दातार म्हणाल्या.
या वृत्तपत्राच्या नंतरच्या अंकांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘राजे’, ‘महाराज’, ‘प्रिन्स’ आणि ‘राया’ असे करण्यात आले असल्याचे पाळंदे-दातार यांनी नमूद केले.
लंडन गॅझेटमध्ये औरंगजेबाने कोचीनच्या ताबा घेण्यासाठी पोर्तुगीज आणि डचांशी केलेली लढाई, औरंगजेब आणि संभाजी यांच्या युद्धाची दखल घेण्यात आली आहे. सूरतहून ब्रिटीशांनी केलेल्या स्थलांतराचे सुतोवाच या पत्रातून केले गेल्याचे दिसते. इतिहासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दस्ताऐवज असून यात पुढे संशोधन करणार असल्याचे पाळंदे-दातार यांनी सांगितले.
इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पुस्तकातील संदर्भात ‘न्यूज बुक’ असा उल्लेख असल्याने त्या काळच्या इतर घडामोडींची नोंद वृत्तपत्रांतून असणार या विचाराने पाळंदे-दातार यांनी या विषयावर संशोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या शिफारस पत्राच्या मदतीने लंडन येथील ब्रिटीश लायब्ररीत उपलब्ध असणाऱ्या संदर्भांचा अभ्यास केला. लंडन गॅझेटच्या रविवार, १७ फेब्रुवारी ते गुरुवार २० फेब्रुवारी १६७२ च्या अंकात सूरत लुटीची बातमी पहिल्या पानावर छापली आहे. लंडनमध्ये त्याकाळी निरनिराळ्या प्रकारची सात-आठ वृत्तपत्रे अस्तित्त्वात होती. त्यापैकी लंडन गॅझेट हे वृत्तपत्र सरकारतफेर् प्रसिद्ध होत असे. यात साधारण बातम्या प्रसिद्ध होत नसत. जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींची दखल वृत्तपत्रातून घेतली जात असे. बातम्यांचे मुख्य स्त्रोत सरकारी दस्ताऐवज, पत्रे असल्याचे पाळंदे-दातार यांनी सांगितले.
सूरत लुटीची बातमी म्हणजे सूरतचे गव्हर्नर अलेपो यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेले पत्र आहे. यात महाराजांचा ’sevagee the rebel’ असा आक्षेपार्ह उल्लेख केला आहे. संपूर्ण देशावर नियंत्रण असलेल्या मुघल साम्राज्याला अनेक लढायांमध्ये हरवले असून आम्हालाही याची भिती वाटते, असे अलेपो यांनी या पत्रात म्हटले आहे. ब्रिटीशांसाठी मुंबई हे ठिकाण सुरक्षित असून यावर ताबा मिळवून येेथे व्यवसायासाठी बंदर उभे करावे, अशी सूचना या पत्रात करण्यात आली असल्याचे पाळंदे-दातार म्हणाल्या.
या वृत्तपत्राच्या नंतरच्या अंकांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘राजे’, ‘महाराज’, ‘प्रिन्स’ आणि ‘राया’ असे करण्यात आले असल्याचे पाळंदे-दातार यांनी नमूद केले.
लंडन गॅझेटमध्ये औरंगजेबाने कोचीनच्या ताबा घेण्यासाठी पोर्तुगीज आणि डचांशी केलेली लढाई, औरंगजेब आणि संभाजी यांच्या युद्धाची दखल घेण्यात आली आहे. सूरतहून ब्रिटीशांनी केलेल्या स्थलांतराचे सुतोवाच या पत्रातून केले गेल्याचे दिसते. इतिहासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दस्ताऐवज असून यात पुढे संशोधन करणार असल्याचे पाळंदे-दातार यांनी सांगितले.
"गनिमीकावा" म्हणजे काय?
शिवाजी महाराजंनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्रासे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे। 'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रुचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. प्रश्न असा उद्भवतो की 'शत्रूचा कपटयुक्त हल्ला' या शब्दाप्रयोगात शत्रू कोण?
मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या निदर्शनात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो। म्हणजे 'गनिमी कावा' ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दाप्रयोगात अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हे लक्षात घेता आपणही मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' असाच करतो आणि मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही!
मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ। मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!'' 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.
'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत। कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.
'महराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत। त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 2. लुच्चेगिरी, 3. गुप्तकट, 4. हुलकावणी आणि 5. पीछेहाट. 'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.
कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणार्या प्रशिक्षणाशी संबंधित आहे। पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते। तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो। मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणार्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता निरनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले.
(शिवकालीन राजनीती आणि रणनीती या पुस्तकातून साभार) - श्रीधर रंगनाथ कुलकर्णी
मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या निदर्शनात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो। म्हणजे 'गनिमी कावा' ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दाप्रयोगात अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हे लक्षात घेता आपणही मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' असाच करतो आणि मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही!
मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ। मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!'' 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.
'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत। कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.
'महराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत। त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 2. लुच्चेगिरी, 3. गुप्तकट, 4. हुलकावणी आणि 5. पीछेहाट. 'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.
कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणार्या प्रशिक्षणाशी संबंधित आहे। पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते। तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो। मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणार्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता निरनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले.
(शिवकालीन राजनीती आणि रणनीती या पुस्तकातून साभार) - श्रीधर रंगनाथ कुलकर्णी
गनिमी कावा............
हैदराबादच्या एका व्यक्ती सोबत मराठ्यांच्या पराक्रमांवर चर्चा झाली.त्या व्यक्तीने चर्चेदरम्यान एक गोष्ट अशी विचारली की,मराठे लपून हल्ला करायचे का? मैदानातून पळून जायचे का? मराठे लुटारू होते का? तो म्हणाला की आम्ही असे ऐकले आहे की मराठे लपूनछपून यायचे,लपून छपूनच हल्ला करायचे आणि लुटून पळून जायचे,खुल्या मैदानात मराठे यायला घाबरायचे.
मला त्याच्या बोलण्याचा अजिबात राग आला नाही कारण आपल्या देशात ...खो
ट्या इतिहासाच्या प्रसाराने अशा बऱ्याच अंधश्रद्धा मराठ्यांच्या बाबतीत पसरल्या आहेत.त्या व्यक्तीला मी सांगितले की लपून छपून हल्ला करून,अचानकपने आश्चर्याचा धक्का देणे, काही कळायच्या आत शत्रूला संपविणे हा मराठ्यांच्या गनिमी काव्याचा भाग होता.आणि गनिमी कावा हा कमीत कमी सैन्य कामी आणून यश मिळविण्याचा एक मार्ग होता.
कारण प्रत्त्येक सैनिकाचा जीव महत्वाचा वाटायचा आमच्या राजाला. तरी तो व्यक्ती काहीना काही म्हणून मराठे असे होते,मराठे तसे होते असा म्हणायचा.त्यामुळे मी त्याला सरळ त्याच्या हैदाराबाद्चेच उदाहरण दिले.त्याला सांगितले की छ.शिवाजी महाराज नावाचा मराठा आपली अवाढव्य फौज घेऊन हैदराबाद मध्ये आला होता.
ती फौज तुमच्याच गोलकोंडा फोर्टमध्ये तशीच सोडून कोणताही अंगरक्षक सोबत न घेता तुमच्याच राजाच्या घरात भेटीसाठी गेला होता,महिनाभर राहिला आणि अशावेळी तुमचाच राजा घाबरला होता,कारण आपला राजा दिसत नाही म्हणून मराठा फौजेने हैदराबाद संपविण्याची योजना बनविली होती.
तेव्हा घाबरून तुमच्याच राजाने छ.शिवरायांना विनंती केली होती की कृपा करून आपल्या सैन्याला शांत करा.आणि तसे झालेसुद्धा.आपलेछत्रपती दिसले तेव्हा मराठे शांत झाले होते.एवढेच काय तुमच्या राजाचा अवाढव्य,भयावह हत्ती येसाजी कंक नावाच्या मराठ्याने एकट्यानेच संपविला होता आणि सिद्ध केले होते की एक मराठा हत्तीच्या ताकदीचा असतो.उदगिरीच्यालढाईत जी लढाई खुल्या मैदानात झाली होती.
त्याच लढाईत इब्राहीम गार्दी सारखा तोफखान्याचा प्रमुख समोर असतांनासुद्धा थोड्याशा तोफ्खान्यासह मराठेच जिंकले होते.स्वाल्हेरच्या लढाईत खुल्या मैदानात ४०००० मराठ्यांनी ८०००० मुघलांना कसे कापले होते हे तुम्हाला माहिती आहे का?आणि ज्या औरंगजेबाला पूर्ण देश घाबरायचा त्याच औरंग्याला त्याच्याच दरबारात हाणून पडून बोलून, छाती ताणून ,ताठ मानेन निघून जाणारा राजा मराठाच होता.आणि जेव्हा देशातील सर्व शूरवीर शेपूट घालून बसले होते.
तेव्हा घरापासून ८०० कोस दूर खुल्या मैदानात अफगानांना टक्कर द्यायला निघाले आणि जीवाची बाजी लावली ती मराठ्यांनीच............असे म्हटल्यावर तो जरा गप्प राहिला........तरी म्हणाला की लुटायची काय गरज असायची?
मी त्याला म्हणालो की,मराठ्यांनी लुटली ती त्या त्या राजाची संपत्ती,लुटला शत्रूचा आत्मविश्वास आणि अहंकार आणि त्याचा त्या परीसरावरचा अधिकार..मराठ्यांनी कधीही कोण्या शेतकरयला लुटले नाही,कोण्या सामान्य माणसाला त्रास दिला नाही,कधीही कोणत्याही स्त्रीची अब्रू लुटली नाही.................असे म्हटल्यावर त्याला बोलायला मार्ग राहिला नाही..........मित्रांनो तुम्हाला जर कुणी असे विचारले तर तुम्ही सुद्धा हेच उत्तर द्या...........छ.शिवाजी महाराज की जय. .
मला त्याच्या बोलण्याचा अजिबात राग आला नाही कारण आपल्या देशात ...खो
ट्या इतिहासाच्या प्रसाराने अशा बऱ्याच अंधश्रद्धा मराठ्यांच्या बाबतीत पसरल्या आहेत.त्या व्यक्तीला मी सांगितले की लपून छपून हल्ला करून,अचानकपने आश्चर्याचा धक्का देणे, काही कळायच्या आत शत्रूला संपविणे हा मराठ्यांच्या गनिमी काव्याचा भाग होता.आणि गनिमी कावा हा कमीत कमी सैन्य कामी आणून यश मिळविण्याचा एक मार्ग होता.
कारण प्रत्त्येक सैनिकाचा जीव महत्वाचा वाटायचा आमच्या राजाला. तरी तो व्यक्ती काहीना काही म्हणून मराठे असे होते,मराठे तसे होते असा म्हणायचा.त्यामुळे मी त्याला सरळ त्याच्या हैदाराबाद्चेच उदाहरण दिले.त्याला सांगितले की छ.शिवाजी महाराज नावाचा मराठा आपली अवाढव्य फौज घेऊन हैदराबाद मध्ये आला होता.
ती फौज तुमच्याच गोलकोंडा फोर्टमध्ये तशीच सोडून कोणताही अंगरक्षक सोबत न घेता तुमच्याच राजाच्या घरात भेटीसाठी गेला होता,महिनाभर राहिला आणि अशावेळी तुमचाच राजा घाबरला होता,कारण आपला राजा दिसत नाही म्हणून मराठा फौजेने हैदराबाद संपविण्याची योजना बनविली होती.
तेव्हा घाबरून तुमच्याच राजाने छ.शिवरायांना विनंती केली होती की कृपा करून आपल्या सैन्याला शांत करा.आणि तसे झालेसुद्धा.आपलेछत्रपती दिसले तेव्हा मराठे शांत झाले होते.एवढेच काय तुमच्या राजाचा अवाढव्य,भयावह हत्ती येसाजी कंक नावाच्या मराठ्याने एकट्यानेच संपविला होता आणि सिद्ध केले होते की एक मराठा हत्तीच्या ताकदीचा असतो.उदगिरीच्यालढाईत जी लढाई खुल्या मैदानात झाली होती.
त्याच लढाईत इब्राहीम गार्दी सारखा तोफखान्याचा प्रमुख समोर असतांनासुद्धा थोड्याशा तोफ्खान्यासह मराठेच जिंकले होते.स्वाल्हेरच्या लढाईत खुल्या मैदानात ४०००० मराठ्यांनी ८०००० मुघलांना कसे कापले होते हे तुम्हाला माहिती आहे का?आणि ज्या औरंगजेबाला पूर्ण देश घाबरायचा त्याच औरंग्याला त्याच्याच दरबारात हाणून पडून बोलून, छाती ताणून ,ताठ मानेन निघून जाणारा राजा मराठाच होता.आणि जेव्हा देशातील सर्व शूरवीर शेपूट घालून बसले होते.
तेव्हा घरापासून ८०० कोस दूर खुल्या मैदानात अफगानांना टक्कर द्यायला निघाले आणि जीवाची बाजी लावली ती मराठ्यांनीच............असे म्हटल्यावर तो जरा गप्प राहिला........तरी म्हणाला की लुटायची काय गरज असायची?
मी त्याला म्हणालो की,मराठ्यांनी लुटली ती त्या त्या राजाची संपत्ती,लुटला शत्रूचा आत्मविश्वास आणि अहंकार आणि त्याचा त्या परीसरावरचा अधिकार..मराठ्यांनी कधीही कोण्या शेतकरयला लुटले नाही,कोण्या सामान्य माणसाला त्रास दिला नाही,कधीही कोणत्याही स्त्रीची अब्रू लुटली नाही.................असे म्हटल्यावर त्याला बोलायला मार्ग राहिला नाही..........मित्रांनो तुम्हाला जर कुणी असे विचारले तर तुम्ही सुद्धा हेच उत्तर द्या...........छ.शिवाजी महाराज की जय. .
सिवाजी महाराज जैसा अगर एक भी राजा...
साधारण दोन वर्षांपूर्वीची हि घटना आहे .मी राजस्थानमध्ये tour manager म्हणून काम करत असताना मी जैसलमेरच्या स्थळ दर्शनासाठी माझ्या सोबत असलेल्या मंडळीना घेऊन यादव भाटी राजाच्या किल्ल्यावर आलो . पिवळ्या मुरूम दगडातून साकारलेला हा किल्ला म्हणजे केवळ आणि केवळ अप्रतिम आहे . हवेल्या , नक्षीदार झरोके सगळे कसे एकदम मस्त .दणका च कि राव ....
उन्हाळा जवळ आला होता तापमान ४० च्या घरात होते अनेक जण घामाघूम झाले सगळ्यांना मस्त थंड काही द्यावे म्हणून मी एका छोट्या चहा टपरी काम हॉटेल मध्ये गेलो एक भाटी राजपूत पिळदार मिश्यांचा तेथे होता मंडळीना जे हवे ते घेण्याची सूचना केली आणि त्या राजपुताच्या मागे भिंतीवर चक्क देव्हार्यात चक्क केवळ आणि केवळ आपले छत्रपती विराजमान होते मग छाती फुलली आणि त्यास विचारले आपणास माहित आहे का यांचे कार्य ? त्याने श्रीमान योगी , राजा शिवछत्रपती आणि संभाजी सगळी पुस्तकेच समोर ठेवली आता तर फुल विकेट उडाली पण आपण वाचले पण समजले कसे तेव्हा तो म्हणाला त्याचा मुलगा मुंबईत राहायला आहे . त्यांचा नातू मराठी माध्यमात जातो तो जेव्हा सुट्टीत गावी येतो तेव्हा त्याच्याकडून समजावून घेतो . त्याच्याच बाजूला भाटी राजाचा पण फोटो होता मी त्यांचे नाव आणि इतिहास विचारला त्यांनी तो आत्मीयतेने सांगितला पण शेवटी एकाच वाक्य म्हणाले
'' सिवाजी महाराज जैसा अगर एक भी राजा जैसलमेर मे होता तो आज जैसलमेर से पाकिस्तानाकी सीमा १०० किमी नाही तो १००० किमी दूर रेहती , आप महाराष्ट्र से आये हे जो मेरे लिये वंदनीय हे ये मेरा प्रणाम रायगड जाके मेरे महारज को दे देना ''
आणि त्या व्यक्तीने चक्क पाय पकडले मी पकडून उचलले तर त्याच्या डोळ्यात पाणी आले होते .
धन्य ते शिवराय
- Harshad Chinchwalkar
"धर्मसाहीष्णुपणा " शिवाजी महाराजांकडून शिकावा
"धर्मसाहीष्णुपणा " शिवाजी महाराजांकडून शिकावा
खान मेला संपला पण .
खानाच्या मुलांना अभयदान दिले
मोठ्या इतमामात राज्यांनी अफ्जाल्खानाची कबर प्रतापगडावर बांधली.
"मरणा नंतर वैर संपत "
हा संदेश येथे शिवाजी महाराजांनी दिला
खान मेला संपला पण .
खानाच्या मुलांना अभयदान दिले
मोठ्या इतमामात राज्यांनी अफ्जाल्खानाची कबर प्रतापगडावर बांधली.
"मरणा नंतर वैर संपत "
हा संदेश येथे शिवाजी महाराजांनी दिला
स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे
१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-
सिंदखेड राजा २) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे ३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)- भातवडी ४) शहाजीराजे - होदिगेरे, ता. कनकगिरी, जि. दावनगेरे (कर्नाटक) ५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला) ६) छत्रपती शिवाजी महाराज - रायगडावर ७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड ८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड ९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल १०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरले पुत्र)- वडू कोरेगाव ११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर १२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचे मित्र)- साल्हेरच्या किल्ल्याजवळ. १३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधान मंडळातील मंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी १४) मकूबाई (शिवरायांच्या भावजयी) - जिती, ता. करमाळा, जि. सोलापूर १५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर- तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड १६) धनाजी जाधव - वडगाव (कोल्हापूरजवळ) १७) रामाजी पांगेरा - कन्हेरगड, ता. दिंडोरी, जि. नाशिक १८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप (गाधवड, जि. पुणे) १९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा -उमरळ २०‹) रायबा (तानाजीचा मुलगा)- पारगड २१) बहिर्जी नाईक - भूपाळगड मौजे बाणूर, ता. आटपाटी, जि. सांगली २२) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्र भाऊ - परळी (रायगडाजवळ) २३) शिवा काशिद - पन्हाळगड २४) कान्होजी जेधे आणि जिवा महा- कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे २५) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर २६) संभाजी कावजी - कोंडावळे, ता. मुळशी, जि. पुणे २७) फिरंगोजी नरसाळा- संग्रामदुर्ग (चाकण) पुणे २८) सिदोजी निंबाळकर - पट्टागड (संगमनेर) २९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू - विशाळगड ३०) दत्ताजी जाधव (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू) निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही. ३१) जानोजी भोसले नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर ३२) जानोजी निंबाळकर (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच नावाने आहे) - बीड ३३) जगदेवराव जाधवराव (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर ३४) नागोजी माने (म्हसवडकर)- सिंदखेडराजा ३५) हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण - अणदूर, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद ३६) अन्नूबाई (पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि. उस्मानाबाद आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील पिढीला प्रेरणा असतात. सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे. |
आजोबा आणि नातू प्रथमच एकत्र.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे छत्रपती थोरले शाहूमहाराज.